जळगाव : आदित्य ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्रभर झंझावती दौरे सुरू आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन आदित्य ठाकरे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जाहीरपणे टिका करीत आहेत. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते असलेल्य़ा गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातून गद्दारांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच येणाऱ्या निवडणुकीत या गद्दारांना धडा शिकवा असं आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी जनतेला केलं. यावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“तर उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कवडीची देखील किमंत राहणार नाही”; देवेंद्र फडणवीस
आदित्य ठाकरे महाराष्ट्र फिरत आहेत. तुम्हीही लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. सर्व उपनेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढा. तसेच, आपण आपली कामं जनतेपर्यंत पोहचवली पाहिजे. त्यासाठी आपल्या प्रत्येक घराघरात पोहचावं लागणार आहे आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे याचा अर्थ जनता आपल्या सोबत आहे. असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“मुख्यमंत्री झाल्यावर असं भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात”; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
सरकार गेल्याचं दु:ख नाही. ते तुम्ही परत आणाल. पण प्रगतीशील महाराष्ट्रा रोखण्याच काम यांनी केलं आहे. कोविड काळात आपला जनतेचा जीव वाचवण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं. याचं जगाने कौतुक केलं. महाराष्ट्र पुढे गेला तर इतरांच काय होईल म्हणूून त्यांच्या पोटात दुखत असेल. कोणत्याही जाती धर्मात वाद न लावणारं आपलं हिंदुत्व आहे. देशात आपलं नाव होत होतं हेच त्यांच्या पोटात दुखलं असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
“आज सूर्य मावळला तर उद्या नक्की उगवत असतो, आता महाभारत घडेल”; महाडिकांचा इशारा
बंड करायला हिमत लागते. यांनी गद्दारी केली. गुवाहाटीला गेले, तिकडे काय काय केलं आपण पाहिलं. गुवाहाटीत गेल्यावर 40 गद्दार लोक स्वत:ला शिवसैनिक समजत होते. मजा करत होते. पण तिथला पुर त्यांना दिसला नाही. राज्यातून शिवसेना संपवण्याचा कट रचण्यात आला. आम्हाला एकटे पडण्याचं हे षडयंत्र आहे. पण मला राज्यातील जनतेला विचारायचं आहे. तुम्ही आम्हाला एकटे पडू द्याल का ? असा सवाल त्यांनी केला. तसेच गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं. बाबाजी का ठुल्लू, असा घणाघाती हल्लाबोल देखील त्यांनी बंडखोर आमदारांवर केला.
Read also
- “शेलार, दरेकर स्वत: च्या भावाला निवडून आणू शकले नाही अन्..;” पेडणेकरांचा हल्लाबोल
- “गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं, बाबाजी का ठुल्लू,”आदित्य ठाकरेंचा घणाघात
- “देशातील काही महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न”; छगन भुजबळ
- “सत्ता तुमची पण आमदार मीच, आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढू”; राष्ट्रवादीच्या आमदाराचा सज्जड दम
- “श्वेता महालेंच्या कार्यक्रमात तुफान हाणामारी, घाईघाईत दहीहंडी फोडली”