मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून विरोधकांवर निशाणा साधत राजकारणातील घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर मुंबईत देखील भाजप नेते आशिष शेलार यांनी महापालिकेतील ठाकरे घराणेशाही संपुष्ठात येईल अशा पद्धतीचं वक्तव्य केले. त्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
“मुख्यमंत्री झाल्यावर असं भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात”; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
भाजपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे, त्यामुळे त्याच्यावर भाजपने एकही शब्द बोलू नये. त्याचबरोबर भ्रष्ट्राचार हा भाजपने आपल्या गोदित घेऊन पावन केला आहे. तसेच जे काही भ्रष्टाचारी होते, त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला मग हे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात कसे चालले ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मुंबई महापालिकेच्या सत्तेत भाजप देखील होता. त्यावेळी तुम्ही किती ओरबडून घेऊन गेलात ते देखील भाजपने सांगितले पाहिजे. असं देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
“आज सूर्य मावळला तर उद्या नक्की उगवत असतो, आता महाभारत घडेल”; महाडिकांचा इशारा
दिपक केसरकर यांनी त्यागाची तर वाच्यता करू नये, कारण ते इतर पक्षांतून उडत उडत येणार आणि त्याग, निष्ठा काय असते ते सांगणार. महाराष्ट्राच्या इतिहास एकाच कुटुंबात दोन मंत्रीपद देण्यात आले. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांनी स्वत: च्या भावाला निवडून आणू शकले नाहीत. तेव्हा तर शिवसेना भाजपसोबत होती. सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी लोक काय म्हणताहेत ते त्यांनी कान देऊन ऐकलं पाहिजे. तसेच जनता काय असेल ते ठरवेल. त्यांना भाटगिरी करू नका. आणि काम करा असं देखील किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
“ज्याठिकाणी माझ्यावर हल्ला झाला, तिथेच जाहीर सभा घेणार, बघू कुणात हिमंत आहे”; उदय सामंत
दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्रभर झंझावती दौरे सुरू आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन आदित्य ठाकरे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जाहीरपणे टिका करीत आहेत. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते असलेल्य़ा गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातून गद्दारांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच येणाऱ्या निवडणुकीत या गद्दारांना धडा शिकवा असं आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी जनतेला केलं.
Read also
- “गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं, बाबाजी का ठुल्लू,”आदित्य ठाकरेंचा घणाघात
- “देशातील काही महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न”; छगन भुजबळ
- “सत्ता तुमची पण आमदार मीच, आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढू”; राष्ट्रवादीच्या आमदाराचा सज्जड दम
- “श्वेता महालेंच्या कार्यक्रमात तुफान हाणामारी, घाईघाईत दहीहंडी फोडली”
“तर उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कवडीची देखील किमंत राहणार नाही”; देवेंद्र फडणवीस