रत्नागिरी : राजकारणात 1999 सालापासून फक्त तुमच्या आधारावर काम करीत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेकदा माझ्यावर टिका झाली. त्याला भीक घातली नाही. त्यानंतर माझ्यावर हल्ला झाला, त्याची क्लिप देखील दाखवण्यात आली. परंतु माझ्यावर जोपर्यंत विश्वास आहे, आणि रत्नागिरीतील लोकांची साथ आहे. तोपर्यंत माझ्या केसाला कोणी धक्का लागणार नाही, असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री उदय सांमंत यांनी केलं. काल दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते.
अब्दुल सत्तार घेणार शरद पवारांकडून शेतीचे धडे; सत्तारांनी कृषीमंत्रिपदाचा कारभार स्विकारला
तसेच ज्याठिकाणी उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला, त्याचठिकाणी थोड्याच दिवसात भव्य सभा घेणार आहे. कुणाच्या अंगात हिंमत असेल तर माझ्या केसाला धक्का लावून दाखवा. लोकशाहीमध्ये एखादा विचार पटला नाही आणि दुसऱीकडे गेलो तर ठार मारायचं? असा सवाल देखील त्यांनी केला. मी जरी संयमी आहे, परंतु हे सर्व मी डोक्यात ठेवलं आहे. याचं उत्तर 2024 ला देणार आहे. असंही देखील ते म्हणाले.
“आम्ही देखील 50 थरांची हंडी फोडली”; एकनाथ शिंदेंची दहीहंडी कार्यक्रमात टोलेबाजी
गुवाहाटीला जाताना चार दिवस थांबून विचार करून गेलो होतो. आजही ठाकरेंबाबत नितांत प्रेम आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबतचा निर्णय साहेबांना पटवून सांगितला आणि त्यानंतर मला भूमिका घ्यावी लागली. असंही देखील उदय सामंत म्हणाले. तसेच रत्नागिरी जिल्हाचा विकासनिधी कमी पडू देणार नाही. तसेच तुमच्या आशीर्वादाने जर पालकमंत्रीपद देण्यात आलं तर चांगली कामे करेन, असं देखील उदय सामंत यांनी उपस्थित जनतेला सांगितलं.
“वरळी जांबोरी मैदानावर भाजपकडून दहीहंडीचे आयोजन”; शिवसेनेची पोस्टरबाजी
दरम्यान, अलिकडेच पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यासंदर्भात पुण्यात सहा जणांना अटक देखील करण्यात आली होती. हल्ला झाला त्याचवेळी आदित्य ठाकरे यांची सभा सुरू होती. सभा संपल्यानंतर शिवसैनिक जात असताना त्यांना उदय सामंत यांची गाडी दिसली आणि त्यांच्यावर त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं होतं.
Read also
- ‘पुण्यातल्या खड्डेमय रस्त्यांवर गाडी चालवणे’ याला साहसी खेळाचा दर्जा देण्यात यावा; राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- “महापालिकेत विजयाची हंडी फोडण्यासाठी हा निर्णय बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतला”
- “संतोष बांगर पुन्हा निवडून आले तर एक लाख लिटर दुधाचा मुख्यमंत्र्यांचा अभिषेक करेन “
- “देवेंद्रजींची जन्मभूमी नागपुर, पण ते पुण्याचे पालकमंत्री झाले तर आनंद होईल”; अमृता फडणवीस
- “उगीच कुणालातरी डिवचणं हा सगळा पोरकटपणा आहे”; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला