मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. पांझलीबोधी व वारंगी येथील अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिलं. तसेच शेतीविषयक प्रश्नांसाठी आपण शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं सत्तार म्हणाले.
“शिंदे-फडणवीस सरकारचा गोविंदासाठी एक मोठा निर्णय”
नागपुर विभागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालं आहे. काही दिवसांपुर्वी केंद्रीय पथक दौऱ्यावर येऊन गेले आहे. त्यांनी पिकांचा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. केंद्राचे पथक पुन्हा एकदा पाहणी साठी येणार आहे. नुकसानापेक्षा कितीतरी कमी नुकसान दाखवण्यात आल्याचं नागरिकांकडून म्हटलं जात आहे. त्यामुळे कृषीमंत्री सत्तार यांच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
“राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार”; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
अतिवृष्टीचे नुकसान झालेल्या नाशिक विभागाचे 100 टक्के पंचनामे झाले आहेत. पावसाच्या नुकसानीचे अर्धे पंचनामे झाले आहेत. एकही शेतकरी मदतीपासुन वंचित राहणार नाही याची मी काळजी घेत आहे. 3 ते 4 दिवसात सगळे पंचनामे होतील. याबाबत, मी सोमवारी सभागृहात निवेदन करणार आहे, असं सत्तार म्हणाले.
“ठाणे मुख्यमंत्र्यांचे घर आहे, पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार?”; एकनाथ खडसे
शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे शक्य आहे, ते आम्ही करणार आहोत. मंत्री, कलेक्टर आणि महसूल अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवसभर त्यांच्या जीवन शैलीचा अभ्यास करणार आहे. तसेच, कृषी विषयक प्रश्नांवर शरद पवार यांचे मार्गदर्शन घेणार असून यासंदर्भात लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचंही मंत्री सत्तार म्हणाले.
Read also
- “आम्ही देखील 50 थरांची हंडी फोडली”; एकनाथ शिंदेंची दहीहंडी कार्यक्रमात टोलेबाजी
- “वरळी जांबोरी मैदानावर भाजपकडून दहीहंडीचे आयोजन”; शिवसेनेची पोस्टरबाजी
- “मुख्यमंत्री साहेब तुमचं वागणं बरं नव्हे”; अन् सभागृहात अजित पवारांनी हात जोडले
- “मी मंत्र्यांशी बोलतोय, तुमच्याशी नाही”; सभागृहातच राणे अन् जाधव यांच्यात खडांजगी
- “देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार”; ब्राम्हण महासंघाचं अमित शाहांना पत्र