पुणे : महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण एकत्रितपणे केलेल्या कामांना स्थगिती देणं हे वागणं बंर नव्हं. असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना इशारा दिला. विधानसभेत विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना यावेळी अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. तसेच कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.
“विरोधकांनी पायऱ्यावर गोंधळ करण्यापेक्षा सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत”; धैयशिलराव माने
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक कामांना त्यांनी स्थगिती देण्यात आली आहे. त्यावर बोलताना अजित पवारांनी सभागृहात चांगलेच चिमचे काढले. यावेळी अजित पवार यांनी हात जोडून हे तुमचं वागणं बंर नव्हे म्हणत एकनाथ शिंदेंना इशारा दिला. तसेच कधी कुणाचे दिवस येतात कधी कुणाचे दिवस जातात. कधी तुम्हाला एकत्रित काम करायला लागेल, हे आपण सांगू शकत नाही असंही अजित पवार म्हणाले.
“गुलाबराव आपण खाली बसा, इथे तुमचा काय संबंध?”; अन् सभागृहात निलम गोऱ्हे संतापल्या
पुढे बोलताना ते म्हणाले की, तसेच सध्याची राज्याची परिस्थिती बिकट असताना काही मंत्री सत्कार समारंभाचा कार्यक्रम करीत आहे. अजित पवार पावसाच्या परिस्थितीवर बोलत असताना मध्येच शंभूराजे म्हणाले की पाऊस चांगला झाला आहे. त्यावर अजित पवार भडकले. कशाचा चांगला पाऊस झाला. राज्यात ओला दुष्काळ पडला आहे. तसेच तुम्हाला 40 लोक संभाळायची आहेत. वरची 10 लोकं अशी तशीच आहेत अशी देखील मिश्किल टिप्पणी केली आहे.
“काळी दाढी अन् पांढरी दाढी”; भुजबळांची नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी
दरम्यान, कालचा विधानसभेतील दिवस अजित पवार यांनी गाजवला. पालघरच्या प्रस्तावर बोलताना तानाजी सांवत हे अडखळले त्यावर अजित पवार संतापले. त्यानंतर माहिती मागवून देतो असं म्हणत तानाजी सावंत बाजूला झाले. तसेच विधान परिषदेमध्ये देखील एकनाथ खडसे यांनी खेकड्यांमुळे धरण फुटले हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला.
Read also
- “मी मंत्र्यांशी बोलतोय, तुमच्याशी नाही”; सभागृहातच राणे अन् जाधव यांच्यात खडांजगी
- “देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार”; ब्राम्हण महासंघाचं अमित शाहांना पत्र
- “शिंदे-फडणवीस सरकारचा गोविंदासाठी एक मोठा निर्णय”
- “राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार”; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
- “ठाणे मुख्यमंत्र्यांचे घर आहे, पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार?”; एकनाथ खडसे