मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू असताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजप नेते नितेश राणे यांना चांगलेच खडसावलं. भास्कर जाधव यांच्या भाषणात सतत अडथळे आणणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांना मी मंत्र्यांशी बोलतो, तुमच्याशी नाही, असं म्हणत राणे यांना गप्प राहण्याच्या सुचना देखील दिल्या. राणे हे शांत होत नसल्याने भास्कर जाधव चांगलेच तापले होते. शेवटी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोघांना शांत केले.
“गुलाबराव आपण खाली बसा, इथे तुमचा काय संबंध?”; अन् सभागृहात निलम गोऱ्हे संतापल्या
सकाळ पासुनच शिवसेना आमदार भास्कर जाधव आक्रमक दिसत होते. दुसऱ्या दिवशी अधिवेशनाचं कामकाज सुरू होऊन 20 मिनिटे झाली होती, तोच लक्षवेधीवरून भास्कर जाधव यांनी सरकारला कोंडीत पकडायला सुरूवात केली. माझ्या लक्षवेधीचं मला उत्तर कधी मिळणार, मला ती उत्तरं वाचून त्यावर प्रश्न विचारायचे आहेत. असं भस्कर जाधव म्हणाले. त्यावर वाचायची गरज काय, पाहिलं तरी तुम्हाला लगेच कळतं.. असं मिश्किल उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
“काळी दाढी अन् पांढरी दाढी”; भुजबळांची नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी
शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर लक्षवेधी मांडली होती. त्यावर मंत्री रविद्र चव्हाण यांनी डिसेंबर 2023 पर्यंत काम पुर्ण करण्यात येईल. कोकणातील सर्व आमदारांसहित या रस्त्याची पाहणी करून त्यावर उपाययोजना केली जाईल, असं उत्तर दिलं. कोकणातील आमदार म्हणुन भास्कर जाधव यांनी सहभाग घेतला. मी या विषयावर सतत प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही थकलो आहे. मात्र शासन तीच उत्तरे देत आहे. त्याला बारा वर्षे झाली आहेत, अशी नाराजी भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
“आता फक्त भाषणावर जीएसटी लावायची बाकी आहे” ; छगन भुजबळांचा केंद्रावर निशाणा
भास्कर जाधव बोलत असताना भाजप नेते नितेश राणे यांनी, मधील अडीच वर्षे वाया गेली असं म्हणत महाविकास आघाडीला टोला लगावला. त्यावर भास्कर जाधव यांनी मला तुमच्याकडून काहीही सल्ला नको. मी मंत्र्यांशी बोलतोय, तुमच्याशी नाही, अश्या शब्दात राणेंचा भास्कर जाधव यांनी फटकारलं.
Read also
- “देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार”; ब्राम्हण महासंघाचं अमित शाहांना पत्र
- “शिंदे-फडणवीस सरकारचा गोविंदासाठी एक मोठा निर्णय”
- “राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार”; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
- “ठाणे मुख्यमंत्र्यांचे घर आहे, पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार?”; एकनाथ खडसे
- “विरोधकांनी पायऱ्यावर गोंधळ करण्यापेक्षा सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत”; धैयशिलराव माने