मुंबई : विधानसभेत ‘महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, २०२२’ या विधेयकावर बोलत असताना आमदार छगन भुजबळ यांनी जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्याबद्दल सरकारवर टीका केली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतले वजन वापरून ही जीएसटी वाढ मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. अन्नपदार्थांसह जीवनाश्यक वस्तू याआधी करमुक्त होत्या. मात्र अन्नपदार्थांवर पाच टक्के जीएसटी लावण्यात आला. तुम्ही कुठल्याही मार्गाने टॅक्स वाढवता तेव्हा त्याचा फटका शेवटी सामान्य माणसालाच बसतो, असे मा. भुजबळ यांनी सांगितले.
“शिवसेना भवनासमोर शिवसेनेकडून निष्ठा दहीहंडीचे आयोजन”
शाळेतील मुलांच्या पेन्सिल, रबरवर देखील जीएसटी वाढवला. हॉस्पिटल्सच्या बिलात देखील जीएसटी लावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय कमिटीत सहभागी केले आहे. त्यांनी त्यांचे वजन वापरून केंद्र सरकारच्या निदर्शनास सामान्य व्यक्तीचे दुखणे लक्षात आणून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच केंद्र सरकार सांगतंय की, देशात आर्थिक मंदी नाही. मग तुम्हाला जीएसटी वाढविण्याची गरजच काय? असा थेट प्रश्नही मा. भुजबळ यांनी उपस्थित केला.
“अजित पवारांनी स्वत: च्या काकांसोबत गद्दारी केली, त्यावेळी नारेबाजी का केली नाही?”
शाळेच्या वस्तू, अन्नधान्यावर जीएसटी लावला, आता फक्त भाषणांवर जीएसटी लावायचा बाकी असल्याचा टोला भुजबळ यांनी लगावला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव उपस्थित करुन पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेकडे सरकारचे लक्ष वेधले आणि या आदिवासीबहुल जिल्ह्यामध्ये काहतरी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले. पालघर जिल्हा एकेकाळी ठाणे जिल्ह्याचाच भाग होता. मुंबईलगत असलेला हा जिल्हा आहे. १५ ऑगस्ट रोजी संबंध देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना पालघर जिल्ह्यात एका आदिवासी भगिनीवर दुर्दैवी वेळ आली.
“शिंदे गटाचा गेम झाला आहे, त्यामुळेच सध्या ते चेहरे लपवत आहेत”
वंदना भुदर या महिलेची घरीच प्रसुती झाल्यानंतर दुर्दैवाने तिच्या जुळ्या मुलांचा घरीच मृत्यू झाला. या महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नाही, रुग्णवाहिका तिथे जाऊ शकत नाही, अशी विदारक परिस्थिती आहे. सरकार कुणाचेही असले तरी या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहीजे. आरोग्यसेवा नसल्यामुळे या बालकांना झोळीत घेऊन जाण्याची वेळ आली. या महिलेच्या जुळ्या अपत्यांपैकी मुलाचे वजन अवघे एक किलो २०० ग्रॅम आणि मुलीचे वजन दोन किलो होते. महाराष्ट्रासाठी लाजिवारणी अशी ही गोष्ट असल्याचे अजितदादा म्हणाले. या घटनेप्रमाणेच १४ ऑगस्टला मर्कटवाडी येथीलच एका गर्भवती महिलेला झोळीतून दवाखान्यात न्यावे लागले. पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आरोग्य सुविधांची दूरवस्था आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुर्दैवाचे दुष्टचक्र थांबविण्यासाठी काहीतरी ठोस प्रयत्न करायला हवेत, अशी भूमिका मा. अजितदादा पवार यांनी मांडली. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्यामध्ये अशाप्रकारच्या दुर्दैवी घटना पुन्हा घडणार नाहीत, याची काळजी शासन घेईल, असे उत्तर दिले.
Read also
- “फडणवीसांचा ‘सागर बंगला’ हा वॉशिंग मशीनचं काम करत आहे”
- 50-50 चलो गुवाहटी..गद्दारांना ताट-वाटी..चलो गुवाहाटी; सलग दुसऱ्या दिवशीही विरोधकांची घोषणाबाजी
- “तुम्ही हजार कोटी घेतलेत, ते घेत असताना तुम्ही नामर्द होते का?” अन् बचू कडू संतापले
- “संजय राऊतांच्या संबंधित आणखी 3 ठिकाणी इडीचा छापा”; महत्त्वाची कागदपत्रे जप्त
- “धनंजय मुंडेंची सगळी लफडी माहितीय, त्यामुळे त्याला आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?”