मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे आज शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने रायगडमध्ये आहेत. रायगडमध्ये ठाकरे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी भाजपच्या कार्यालयासमोर आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. तुम्ही घाबरू नका, ही लढाई तुमच्याविरोधात नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर पुन्हा निशाणा साधला आहे.
“शेलारांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”; विरोधकांची घोषणाबाजी अन् शेलारांची एन्ट्री
आज पावसात चालताना वेग वाढला. याच मातीतील आपण लोक आहेत. या गद्दारीत रायगडाला काय मिळाले? मी पहिला आमदार आहे, राजकारणात जे काही पाहायचे ते पाहिले. कोविडच्या काळ पाहिला. मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय या रायगडासाठी 600 कोटी दिले. आम्ही गद्दारांचे विधानभवनात चेहरे बघत होते. गेम झाल्याचे चेहऱ्यावर दिसत होते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.
“निवडणुकीच्या काळात मोदींचा फोटो दाखवून मतं घ्यायची अन् नंतर सोनिया गांधींच्या गोदीत जाऊन बसायचं”
राज्यात मंत्रिमंडळ जाहीर व्हायला 41 दिवस लागले. या मंत्रिमंडळात रायगडाचे कोणी नाही. मुंबईचे कोणी नाही, महिलांना स्थान नाही, अशी टिका आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे. हे गद्दारांचे सरकार आहे, कोसळणार म्हणजे कोसळणारच. या लोकांना दुय्यम खाती मिळाली, आता पश्चाताप तोंडावर दिसतोय. यांना गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त दिले डोळे बंदकरून मिठी मारली पण यांनी पाठित खंजीर खुपसला, अशी खंत देखील आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
अजित पवारांना धक्का..! सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार”; प्रविण दरेकर
उठाव करायला ताकद लागते, त्यांनी पळुन जाऊन गद्दारी केली. हे खरे शिवसैनिक असते तर डोंगर हॉटेल बघितले नसते तर त्याचवेळी आसामच्या पुरात मदतीला उतरले असते. खायला तिकडे अन्न नव्हते, मदत हवी होती. शिवसैनिक असते तर मदत करायला उतरले असते. दु:ख सरकारमधुन बाहेर पडल्याचं नाही तर दु:ख याचे आहे की यांना सर्वोतपरी मदत केली, तिकिटं दिली, सभा घेतल्या यांनीच गद्दारी केली, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
Read also
- “एकनाथ अन् देवेंद्र देवांची नावं, नानांनी यांचं नाव घेतलं तर भलं होईल”
- ” मंत्रिमंडळात बदल करून सत्तारांना शिक्षण मंत्री, राठोडांना महिला व बालकल्याण, तर सुर्वेंना गृहमंत्री करा” रूपाली पाटील
- “सिंचन घोटाळ्याचा विषय आता संपला”; मोहित कंबोजच्या ट्विटनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- “भाजपने नितीन गडकरींना वगळलं, तर फडणवीसांची चांगल्या ठिकाणी वर्णी”
- “विनायक मेटेेंच्या पत्नीला भाजपने विधान परिषदेवर घ्यावे”; राष्ट्रवादीकडून मागणी