मुंबई : दहिहंडीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीकडून वरळीच्या जांबेरी मैदानात दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचा गढ म्हणुन देखील वरळीला ओळखले जाते मात्र याच ठिकणी आता भाजपने आपलं अस्तित्व निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेचे वरळीत तीन आमदार आणि एक खासदार असुनही जांबेरी मैदान शिवसेनेला मिळवता आलेलं नाही. यावरून गड कुणाचा? कोणी ठरवलं? गड ठरवणं हे शेलार मामाचं काम आहे, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे.
लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली ‘पंचप्राणाची’ संकल्पना; वाचा सविस्तर
भाजप मुंबईत 227 ठिकाणी दहिहंडी उत्सव साजरा करणार आहे. वरळी हा शिवसेनेचा गड आहे हे आम्ही मानत नाही. आदित्य ठाकरे हे युतीतुन निवडून आले आहेत. त्यामुळे ग़ड वगैरे मानायचा प्रश्नच येत नाही. कुणाचा गड कोणता गड आहे हे शेलार मामांशिवाय कोण ठरवू शकत नाही असं म्हणत जांबरी मैदान तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है, असं आशिष शेलार यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे.
आता ‘हॅलो’ नाही तर ‘वंदे मातरम्’ म्हणायचं; खाते वाटपानंतर सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा
आदित्य ठाकरे हे वारंवार ज्या भाषेचा उपयोग करत आहेत ती भाषा अशोभनीय आहे. शिवसेनेने निवडणुकीच्या काळात मोदींचा फोटो दाखवून मतं घ्यायची आणि नंतर सोनिया गांधींच्या गोदीत जाऊन बसायचं, ही शिवसेनेची बेईमानी नाही का? मदत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यायची आणि सत्तेत गोड फळ चाखण्यासाठी शरद पवार यांच्या गोदीत जाऊन बसायचं याला लाचारी म्हणत नाहीत का?, असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या अनेकांच्या फडणविसांनी सुरूवातीलाच मुसक्या आवळाल्या”
मोहित कंबोज यांचा ट्रॅकिंग रेट 100 टक्के आहे. ते माहिती शिवाय बोलत नाहीत. त्याचं ट्विट गंभीर आहे. यावर कंबोज त्यांचं म्हणणं स्पष्ट करतील, त्यावर मला काही माहिती नाही. याबाबत सरकार स्पष्टता देऊ शकतं, असंही आशिष शेलार म्हणाले.
Read also
- अजित पवारांना धक्का..! सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार”; प्रविण दरेकर
- “50 खोके एकदम ओके, आले रे आले गद्दार आले “;मुंडेंनी गाजवलं आज विधिमंडळाचं अधिवेशन
- “हे बेईमानी सरकार आहे, ते लवकरच कोसळणार”, आदित्य ठाकरेंचं सुचक व्यक्तव्य
- मोहित कंबोज हा ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का ? इडीचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीचा सवाल
- “महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरूय” सुप्रिया सुळेंचं वक्तव्य