मुंबई : सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा, महिलांचा तसेच सर्वसामान्य माणसांचा आवाज कुणी बनत नाही. कुणी काय मिळालं, कुणाला काय मिळालं नाही, याचा विचार सध्याचं सरकार करीत आहे. जे आमच्यात मंत्री होते, तेच मंत्री तिकडे जाऊन झालेत. जे काही निष्ठावंत होते, त्यांना काहीच मिळाले नाही. निष्ठेला, अपक्षांना, तसेच महिलांना या सरकारमध्ये कुठेही स्थान देण्यात आलं नाही.
सध्याचं सरकार हे बेकायदेशीर असून ते लवकरच कोसळणार असल्याचंही सुचक वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ह्या नेत्यांची निष्ठा बघितली तर ते एका पक्षाबरोबर राहिले नाहीत. एका माणसांसोबत राहिले नाहीत. अशा लोकांना पुन्हा एकदा दुसरीकडे जाऊन काहीच मिळालं नाही. तसेच महाराष्ट्रातील जनता त्यांना आपलं स्थान आगामी निवडणुकीच्या काळात दाखवून देईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
“खातेवाटपात भाजपने शिंदेंवर लिंबू मिर्ची फिरवली?” शिवसेनेची भाजपवर जहरी टिका
आजपासून राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. विरोधी पक्षांनी सुरूवातीलाच विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. यावेळी 50 खोके आले असं म्हणत विरोधकांनी बंडखोर आमदारांवर निशाणा देखील साधला. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधिमंडळ पायऱ्यावरील आंदोलन चांगलचं गाजवलं.
“मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला फक्त पाने पुसली”
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचं हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे सुरूवातीपासून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात मुख्यमंत्र्यांना विरोधक अडचणीत सापडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याआधी आज मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्याला पाठिंबा दिला.
Read also
- मोहित कंबोज हा ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का ? इडीचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीचा सवाल
- “महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरूय” सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
- लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली ‘पंचप्राणाची’ संकल्पना; वाचा सविस्तर
- आता ‘हॅलो’ नाही तर ‘वंदे मातरम्’ म्हणायचं; खाते वाटपानंतर सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा
- “राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या अनेकांच्या फडणविसांनी सुरूवातीलाच मुसक्या आवळाल्या”