मुंबई : राजकीय घराणेशाहीमुळे भारतातील प्रत्येक संस्थेमध्ये घराणेशाहीला पोषण दिले जात आहे. याच कारणामुळे माझ्या देशाचे सामर्थ्य, बुद्धीमत्तेला नुकसान पोहोचत आहे. घराणेशाहीमुळे गुणवत्तेला वाव मिळत नाही. घराणेशाही, परिवारवाद हा देखील भ्रष्टाचारास कारणीभूत ठरतोय. घराणेशाहीविरोधात आपल्याला जागरूकता निर्माण करावी लागेल. संस्थांना वाचवायचे असेल तर आपल्याला हे करावे लागेल. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील भ्रष्ट्राचार, घराणेशाही इत्यादी विषयावर विरोधकांवर कडाडून प्रतिकार केला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, घराणेशाहीला कोणीही आणू शकत नाही. जनतेने त्या लोकांना निवडून दिलं तर लोकशाहीत ते निवडून जाऊ शकतात. घराणेशाही संपवली संपवली पाहिजे असे बोलले जाते. पण जनतेने निवडून दिलं तरच घराण्यातील लोक निवडून येतात.
“तर चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील”; गडकरींचं सुचक वक्तव्य
नेहरूंच्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीनंतर इंदिरा गांधी यांनी देशाची सुत्रे हाती घेतली. इंदिरा गांधी यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यांनी भारतात संगणक युग आणले, मिस्टर क्लीन अशी त्यांची प्रतिमा होती. घराणेशाही-घराणेशाही असं म्हटलं जातं. ज्यांच्यामध्ये कुवत नाही. ताकद नाही, कर्तत्व नाही, नेतृत्व नाही, अशांना बळजबरीने पदावर बसलं तर त्याला घराणेशाही म्हणू शकता. पण एखाद्या घरामध्ये जन्माला आलेली पुढची पिढी ही कर्त्वत्ववान असेल, त्यांच्या भागातील जनतेने त्यांना आमदार-खासदार केलं. तर त्याला घराणेशाही म्हणणे चुकीचे ठरेल असंही अजित पवार म्हणाले.
“शहीद होऊन अमर तरी झाला असता बाळासाहेबांसाठी नाही तर आनंद दिघेंसाठी”
आपण एका निर्णायक कालखंडात प्रवेश करत आहोत. मी लाल किल्ल्यावरून मोठ्या जबाबदारीने बोलत आहे. मला भ्रष्टाचाराच्या लढाईला गती द्यायची आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. मला आशीर्वाद द्या. ही लढाई लढण्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. मला सामान्य लोकांचे जगणे सुकर करायचे आहे. कधीकधी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात उदारता दाखवली जाते. कोणत्याही देशाला भुषणावह नाही. काही ठिकाणी तर कोर्टाने शिक्षा सुनावलेली असली तरी, भ्रष्टाचारी असल्याचे सिद्ध झाले असले तरी त्यांचे महिमामंडन केले जाते. त्यांना प्रतिष्ठा दिली जाते. जोपर्यंत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात चीड निर्माण होणार नाही. तोपर्यंत भ्रष्टाचार कमी होणार नाही. असंही आज आपल्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले.
Read also
- “खातेवाटपात भाजपने शिंदेंवर लिंबू मिर्ची फिरवली?” शिवसेनेची भाजपवर जहरी टिका
- “मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला फक्त पाने पुसली”
- नरेंद्र मोदींचा घराणेशाहीवर हल्लाबोल; लाल किल्ल्यावर मोदींचं दमदार भाषण
- “अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा, पण सध्या…;”; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
- “बावनकुळे खुप मेहनती, त्यांनी बायको पळवून आणली”; गडकरींची जोरदार टोलेबाजी