पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील खाते वाटप करण्यात आले. यामध्ये महत्वाची खाती भाजपने घेतली असल्याची टिका आता विरोधी पक्षांकडून केली जात आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी खातेवाटपावरून शिंदे सरकारवर खोचक टिप्पणी केली आहे. शिंदे गटातील 10 तर भाजपचे 10 असे एकूण 20 मंत्र्यांना खाती सोपवण्यात आली आहेत.
“तर चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील”; गडकरींचं सुचक वक्तव्य
शिंदे आणि भाजप यांच्या सरकारचे खातेवाटप अखेर जाहीर झाले , खातेवाटप पाहता सगळी महत्वाची खाती भाजपकडे आणि उरलेलं राहिलेलं शिंदे गटाकडे असे चित्र आहे , आपणच शिवसेना आणि आपणच हिंदुत्ववादी अशी ओरड करताना शिंदे गटातले भरत गोगावले यांनी शरद पवार यांनी शिवसेनेवर काळी जादू केली असे वक्तव्य केले होते. त्याची आठवण करत मग आता भाजपने तुमच्या गटाला लिंबू मिर्ची बांधली का हो स्वयंघोषित हिंदुत्ववादी, असा प्रश्न करत शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी शिंदे गटाची फिरकी घेतली आहे.
“शहीद होऊन अमर तरी झाला असता बाळासाहेबांसाठी नाही तर आनंद दिघेंसाठी”
आपण म्हणू तेच भाजपचे वरिष्ठ नेते ऐकतात या भ्रमात असलेले शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री आता भाजपचे पाणी ओळखू लागले असावेत . सगळी महत्वाची खाती भाजपकडे आणि उरलेले सुरलेले राहिलेले खाते यांच्या गटाकडे दिले गेले त्यामुळे शिंदे आणि गटाची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही , अवघड जागेच दुखणे अशीच यांची अवस्था झाली आहे असा टोलाही कान्हेरे यांनी लगावला .
शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याचा फायदा! केंद्रात सेनेच्या ‘या’ दोन खासदारांना मिळणार मंत्रिपद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर ंकोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग देण्यात आलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहे.
Read also
- “मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला फक्त पाने पुसली”
- नरेंद्र मोदींचा घराणेशाहीवर हल्लाबोल; लाल किल्ल्यावर मोदींचं दमदार भाषण
- “अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा, पण सध्या…;”; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
- “बावनकुळे खुप मेहनती, त्यांनी बायको पळवून आणली”; गडकरींची जोरदार टोलेबाजी
- उद्योगनगरी तिरंगामय..! ‘हर घर तिरंगा’ संकल्पनेतून देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे स्मरण : महेश लांडगे