मुंबई : आजच्या ६२ वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देत उद्धव ठाकरे म्हणाले की, म्हणता म्हणता ६२ वर्ष झाली, माझ पण वय ६२. मार्मिक ६२ व्या वर्षी चिरतरुण. आजोबा बाळासाहेब म्हणायचे विचाराने माणूस थकता कामा नये. देसाई, रावते, चिरतरुण झाले. मार्मिक शिवसेना हे तरुणांचे आकर्षण. व्यंगचित्र काय करु शकते याचे उदाहरण शिवसेना. मार्मिकने शिवसेनेची बीजं पेरली, अस्वस्थ मन हेरल आणि शिवसेना जन्मली नंतर सामनाचा जन्म झाला. आजोबांपासून विचारांची पेरणी. ज्यावेळा मार्मिकचा जन्म झाला ते साल १९६० तेव्हा देशाचे स्वातंत्र्य १३ वर्षांचे होते, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते व्यंगचित्र साप्ताहिक “मार्मिक” ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी संबोधन केलं.
मला काय संजय राऊत समजलं का? अन् अमित ठाकरेंनी दाखवला ठाकरी बाणा
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ नुकतीच संपली होती. बाळासाहेबांनी विचार केला आणि व्यंगचित्र साप्ताहिक काढले. त्यावेळी मुंबई मिळवली तरी मराठी माणसावर अन्याय होताच त्याची वाचा फोडण्याचे काम मार्मिकने केले. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना आणि व्यंगचित्र काढली. आता व्यंगचित्रकार किती हा वादाचा विषय पण व्यंगचित्रकार असायलाच हवा. महाराजांच्या काळात जे शाहीर काम करायचे ते व्यंगचित्रकाराच्या रेषेत सामर्थ्य होते. परवा देशाचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. कार्टुन कंबाईन्सने १९४७ पासून व्यंगचित्र प्रकाशित करावी अशी इच्छा आहे. मी शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांचे पुस्तक काढू शकलो याचा आनंद आहे. सगळ बदलत पण परिस्थिती तीच आहे. अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.
“शिरसाठांचे ट्विट म्हणजे त्यांच्या ‘अंतरात्म्याचा आवाज’ होता”; शिंदे गटावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
देशाचा स्वातंत्र्याचा वर्धापन दिन बाळासाहेबांचे १९८० सालचे व्यंगचित्र दाखवले. अस्वस्थ मनाची व्यथा व्यंगचित्र मांडतो. १९७८ सालचे अजून एक व्यंगचित्र, तो काळ भोगलेल्या पिढीला ते जाणवेल. मोरारजींची हेकडी वृत्ती दर्शवणारे ते व्यंगचित्र. आज सगळ्यांनी लोकशाही टिकेल का? मार्मिक केवळ साप्ताहिकाचे नाव नाही तर व्यंगचित्रे सुध्दा मार्मिक. नुकतेच प्रकाशित तिरंगा आहे. पण घर नाही पण सरकार म्हणते घर घर तिरंगा. हा मार्मिकपणा आहे असे व्यंगचित्र काढणारे आजही आहेत. म्हणूनच शाहीर व्यंगचित्रकाराची तुलना देखील त्यांनी केली.
“सरकार आलं आहे, मंत्रिपद आल्यास, थांबणार नाही, झुकणार नाही, आता माझ्याकडे वेळच वेळ;
आता आपण परत गुलामगिरीकडे चाललो का? प्रत्येक माणसाचे मत एकच असेल असे नाही. परंतु ८-१० दिवसापूंर्वी नड्डांनी जे वक्तव्य केले ते लोकशाहीला घातक आहे. एकच पक्ष टिकणार इतर पक्ष संपणार. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावात किती कुळ मला आहे. माहित नाही पण किती कुळ आली तरी शिवसेना संपणार नाही. सगळे मिळून संघ राज्य पद्धत, प्रादेशिक पक्ष संपवायचे हे नड्डांचे मत आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला. अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा. सध्या सोशल मीडियाचा जमाना पण ते सोशल का? लष्करात कपात करण्याची बातमी धोकादायक आहे. लष्कर प्रचंड असायलाच हवे. चीन अमेरिका यांनी आधुनिकीकरणसाठी सैन्य कपात केल्याचे ऐकिवात नाही. सरकार पाडायला पैसे आहेत पण लष्करासाठी नाही. नुसता तिरंगा लावून चीन परत जाणार का? घरावर तिरंगा हा लषकराला वाटायला हवे आम्ही सोबत आहोत. मला आज राजकीय बोलायचे नाही. पण महाराष्ट्रात आपत्ती असतांना सरकारचा पत्ता नाही मंत्र्यांचा पत्ता नाही मौज मजा सुरु आहे. असंही देखील ते म्हणाले.
Read also
- “बावनकुळे खुप मेहनती, त्यांनी बायको पळवून आणली”; गडकरींची जोरदार टोलेबाजी
- उद्योगनगरी तिरंगामय..! ‘हर घर तिरंगा’ संकल्पनेतून देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे स्मरण : महेश लांडगे
- “तर चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील”; गडकरींचं सुचक वक्तव्य
- “शहीद होऊन अमर तरी झाला असता बाळासाहेबांसाठी नाही तर आनंद दिघेंसाठी”
- शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याचा फायदा! केंद्रात सेनेच्या ‘या’ दोन खासदारांना मिळणार मंत्रिपद