नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील भ्रष्ट्राचार, घराणेशाही इत्यादी विषयावर कडाडून प्रतिकार केला. त्याआधी स्वांतत्र्य मिळून भारताला 75 वर्ष पुर्ण होत असल्याने देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर कडाडून टिका देखील करण्यात आले.
शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याचा फायदा! केंद्रात सेनेच्या ‘या’ दोन खासदारांना मिळणार मंत्रिपद
आपण एका निर्णायक कालखंडात प्रवेश करत आहोत. मी लाल किल्ल्यावरून मोठ्या जबाबदारीने बोलत आहे. मला भ्रष्टाचाराच्या लढाईला गती द्यायची आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. मला आशीर्वाद द्या. ही लढाई लढण्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. मला सामान्य लोकांचे जगणे सुकर करायचे आहे. कधीकधी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात उदारता दाखवली जाते. कोणत्याही देशाला भुषणावह नाही. काही ठिकाणी तर कोर्टाने शिक्षा सुनावलेली असली तरी, भ्रष्टाचारी असल्याचे सिद्ध झाले असले तरी त्यांचे महिमामंडन केले जाते. त्यांना प्रतिष्ठा दिली जाते. जोपर्यंत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात चीड निर्माण होणार नाही. तोपर्यंत भ्रष्टाचार कमी होणार नाही. असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
मला काय संजय राऊत समजलं का? अन् अमित ठाकरेंनी दाखवला ठाकरी बाणा
घराणेशाही हा देखील एक मुद्दा आहे. राजकीय घराणेशाहीमुळे भारतातील प्रत्येक संस्थेमध्ये घराणेशाहीला पोषण दिले जात आहे. याच कारणामुळे माझ्या देशाचे सामर्थ्य, बुद्धीमत्तेला नुकसान पोहोचत आहे. घराणेशाहीमुळे गुणवत्तेला वाव मिळत नाही. घराणेशाही, परिवारवाद हा देखील भ्रष्टाचारास कारणीभूत ठरतोय. घराणेशाहीविरोधात आपल्याला जागरूकता निर्माण करावी लागेल. संस्थांना वाचवायचे असेल तर आपल्याला हे करावे लागेल. असंही ते म्हणाले.
“शिरसाठांचे ट्विट म्हणजे त्यांच्या ‘अंतरात्म्याचा आवाज’ होता”; शिंदे गटावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्यावर टिका केली आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये विशेष गुण असेल तसेच तो व्यक्ती जनतेमधून निवडून येत असतो त्यामुळे याला घराणेशाही म्हणता येईल असं म्हणता येणार नाही.
Read also
- “अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा, पण सध्या…;”; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
- “बावनकुळे खुप मेहनती, त्यांनी बायको पळवून आणली”; गडकरींची जोरदार टोलेबाजी
- उद्योगनगरी तिरंगामय..! ‘हर घर तिरंगा’ संकल्पनेतून देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या प्रत्येकाचे स्मरण : महेश लांडगे
- “तर चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील”; गडकरींचं सुचक वक्तव्य
- “शहीद होऊन अमर तरी झाला असता बाळासाहेबांसाठी नाही तर आनंद दिघेंसाठी”