नवी दिल्ली : भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या महत्वाच्या समितीमधून डावलण्यात आलं आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपने महत्वाच्या समितीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय पातळीवरही महाराष्ट्राचा नेता म्हणून भाजपकडून आता देवेंद्र फडणवीस यांना पाहण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे यावर आता नितीन गडकरी यांचे समर्थक नाराज देखील झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
“हे बेईमानी सरकार आहे, ते लवकरच कोसळणार”, आदित्य ठाकरेंचं सुचक व्यक्तव्य
भाजपकडून आज केंंद्रीय संसदीय समिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना समितीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर त्यांच्याऐवजी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एडीयुरप्पा आणि आसामचे माजी मुख्यमंत्री सरमानंद सोनोवाल यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये सध्या 11 जणांचा समावेश कऱण्यात आला आहे.
मोहित कंबोज हा ब्रह्मज्ञान घेतलेला व्यक्ती आहे का ? इडीचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीचा सवाल
त्याचबरोबर भाजपकडून निवडणुक समिती देखील जाहीर करण्यात आली आहे. या समितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आलं आहे. ही समिती निवडणुकीतील तिकीट वाटपासंबंधी निर्णय घेत असते. या समितीत महाराष्ट्राचे एकमेव नेते म्हणून फडणवीसांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात भाजपवर तर फडणवीसांचं वर्चस्व आहेच. आता राष्ट्रीय पातळीवरही महाराष्ट्राचा नेता म्हणून भाजपतून फडणवीसाचं चेहरा पाहिला जाणार हे आता यामधून स्पष्ट झालं आहे.
“महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरूय” सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
दरम्यान, भाजपच्या संसदीय समितीत जे,पी, नड्डा, नरेंद्र मोदी, राजनाथ शिंह, अमित शाह, एडियुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के, लक्ष्मण, एक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटीया आणि बी, एल संतोष यांना स्थान देण्यात आलं आहे.
Read also
- “विनायक मेटेेंच्या पत्नीला भाजपने विधान परिषदेवर घ्यावे”; राष्ट्रवादीकडून मागणी
- “शेलारांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”; विरोधकांची घोषणाबाजी अन् शेलारांची एन्ट्री
- “निवडणुकीच्या काळात मोदींचा फोटो दाखवून मतं घ्यायची अन् नंतर सोनिया गांधींच्या गोदीत जाऊन बसायचं”
- अजित पवारांना धक्का..! सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार”; प्रविण दरेकर
- “50 खोके एकदम ओके, आले रे आले गद्दार आले “;मुंडेंनी गाजवलं आज विधिमंडळाचं अधिवेशन