मुंबई : दहिहंडी आणि गणेश उत्सव कोणत्याही निर्बंध असणार नाहीत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. यामुळे मुंबई, ठाण्यात दहिहंडी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. अशातच शिवसेनेकडून दादरमध्ये शिवसनेना भवनासमोर निष्ठा दहिहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शिंदेगट शिवसेना भवनासमोर प्रति शिवसेना भवन उभारणार आसल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेना शक्तीप्रदर्शन करणार असल्याची चर्चा देखील होत आहे.
“भाजपने नितीन गडकरींना वगळलं, तर फडणवीसांची चांगल्या ठिकाणी वर्णी”
शिवसेनेच्या दादरमधील शिवसेना भवनासमोर निष्ठा दहिहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत त्यांच्या अधिकृत ट्विटर वर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. निष्ठा दहिहंडी उत्सव निष्ठेचा, जल्लोष दहिहंडीचा असं लिहण्यात आले आहे. शिवसेना आणि शिंदे गटात यामुळे चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
“विनायक मेटेेंच्या पत्नीला भाजपने विधान परिषदेवर घ्यावे”; राष्ट्रवादीकडून मागणी
दरम्यान, भाजप मुंबईत 227 ठिकाणी दहिहंडी उत्सव साजरा करणार आहे. याशिवाय आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघ असणाऱ्या वरळीत देखील भाजपने दहीहंडीचे आयोजन केले आहे. वरळईच्या जांबोरी मैदानात भाजप दहीहंडी साजरी करणार आहे. वरळी हा शिवसेनेचा गड आहे हे आम्ही मानत नाही. आदित्य ठाकरे हे युतीतुन निवडून आले आहेत. त्यामुळे ग़ड वगैरे मानायचा प्रश्नच येत नाही. कुणाचा गड कोणता गड आहे हे शेलार मामांशिवाय कोण ठरवू शकत नाही असं म्हणत जांबरी मैदान तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है, असं आशिष शेलार यांनी एकप्रकारे इशाराच दिला आहे.
“शेलारांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”; विरोधकांची घोषणाबाजी अन् शेलारांची एन्ट्री
शिवसेनेचा गड म्हणुन देखील वरळीला ओळखले जाते मात्र याच ठिकणी आता भाजपने आपलं अस्तित्व निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेचे वरळीत तीन आमदार आणि एक खासदार असुनही जांबेरी मैदान शिवसेनेला मिळवता आलेलं नाही. यावरून गड कुणाचा? कोणी ठरवलं? गड ठरवणं हे शेलार मामाचं काम आहे, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे.
Read also
- “अजित पवारांनी स्वत: च्या काकांसोबत गद्दारी केली, त्यावेळी नारेबाजी का केली नाही?”
- “शिंदे गटाचा गेम झाला आहे, त्यामुळेच सध्या ते चेहरे लपवत आहेत”
- “एकनाथ अन् देवेंद्र देवांची नावं, नानांनी यांचं नाव घेतलं तर भलं होईल”
- ” मंत्रिमंडळात बदल करून सत्तारांना शिक्षण मंत्री, राठोडांना महिला व बालकल्याण, तर सुर्वेंना गृहमंत्री करा” रूपाली पाटील
- “सिंचन घोटाळ्याचा विषय आता संपला”; मोहित कंबोजच्या ट्विटनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया