मुंबई : राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी शिंदे- फडणवीस सरकारला धारेवर धरले. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काल सारख्याच आज देखील विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. फिफ्टी- फिफ्टी… चलो गुवाहटी… गद्दारांना ताट-वाटी… चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी, अशा घोषणा देत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला.
“शिंदे गटाचा गेम झाला आहे, त्यामुळेच सध्या ते चेहरे लपवत आहेत”
विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, इडी सरकार हाय हाय, फसवी मदत जाहीर करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, सरकार हमसे डरती है इडी को आगे करती है अशा घोषणा देत शिंदे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांबाबत देखील घोषणा दिल्या.यावेळी शिंदे गटातील आमदार गांगरून गेला.
“एकनाथ अन् देवेंद्र देवांची नावं, नानांनी यांचं नाव घेतलं तर भलं होईल”
पहिल्या दिवशी झालेल्या प्रकरामुळे एकनाथ शिंदे यांनी लगेच बंडखोर आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीत त्यांनी विरोधकांना जशाच तशा उत्तर देण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अपक्ष आमदार बच्चू कडू गैरहजर राहिल्याने सभागृहात चांगलीच चर्चा रंगली होती. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्यानेच बच्चू कडू नाराज असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे जे काही महत्वाचे विषय असतील सरकारने याबाबत घोषणा केली असेल पण यामध्ये जी काही दुरूस्ती करणं गरजेचं आहे त्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटुन सांगणार आहोत. 15 सप्टेंबरला शिंदे सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार आहे. यामध्ये बच्चू कडू मंत्री राहिल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी मला दिला आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.
Read also
- “तुम्ही हजार कोटी घेतलेत, ते घेत असताना तुम्ही नामर्द होते का?” अन् बचू कडू संतापले
- “संजय राऊतांच्या संबंधित आणखी 3 ठिकाणी इडीचा छापा”; महत्त्वाची कागदपत्रे जप्त
- “धनंजय मुंडेंची सगळी लफडी माहितीय, त्यामुळे त्याला आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?”
- “शिवसेना भवनासमोर शिवसेनेकडून निष्ठा दहीहंडीचे आयोजन”
- “अजित पवारांनी स्वत: च्या काकांसोबत गद्दारी केली, त्यावेळी नारेबाजी का केली नाही?”