मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने जोरदार घोषणाबाजी करत शिंदे सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. 50 खोके एकदम ओके, रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, आले रे आले गद्दार आले, याबरोबर भाजप आमदार आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा उल्लेख करीत अशी घोषणाबाजी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावेळी केली. या पार्श्वभूमीवर आता आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांवर टिका केली आहे.
“एकनाथ अन् देवेंद्र देवांची नावं, नानांनी यांचं नाव घेतलं तर भलं होईल”
50 खोके एकदम ओके अश्या घोषणा विरोधी पक्षातील नेत्यांकडून देण्यात आल्या, यावर बच्चू कडू म्हणाले की, आम्ही म्हणतोय का तुम्ही हजार कोटी घेतलेत. तुम्ही खोके घेत असताना नामर्द होते का? आम्हाला आडवलं का नाही. थांबवायचं होतं. तुम्हाला कसं स्पष्ट माहित आहे की 50 आकडा आहे कोणाला 49 गेले का, कोणाला 58 गेले का 55 गेले. विरोधक हा असा प्रत्येकावर आरोप करतच असतो.
माझा ही फोन टॅपिंग झाला होता, पण हे चुकीचं आहे. याप्रकरणात मी गांजा तस्करी करत असल्याचं काही निष्पन्न आलेलं होतं, हे असं होत असेल तर लोकशाहीसाठी घातक आहे, असं बच्चू कडू म्हणाले. रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधान आले आहे. या प्रकरणात आमदार बच्चू कडू यांचीही चौकशी करण्यात आली होती. आता या प्रकरणात राज्य सरकार कोणती पाऊले टाकणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
“सिंचन घोटाळ्याचा विषय आता संपला”; मोहित कंबोजच्या ट्विटनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे जे काही महत्वाचे विषय असतील सरकारने याबाबत घोषणा केली असेल पण यामध्ये जी काही दुरूस्ती करणं गरजेचं आहे त्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटुन सांगणार आहोत. 15 सप्टेंबरला शिंदे सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार आहे. यामध्ये बच्चू कडू मंत्री राहिल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी मला दिला आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.
Read also
- “संजय राऊतांच्या संबंधित आणखी 3 ठिकाणी इडीचा छापा”; महत्त्वाची कागदपत्रे जप्त
- “धनंजय मुंडेंची सगळी लफडी माहितीय, त्यामुळे त्याला आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?”
- “शिवसेना भवनासमोर शिवसेनेकडून निष्ठा दहीहंडीचे आयोजन”
- “अजित पवारांनी स्वत: च्या काकांसोबत गद्दारी केली, त्यावेळी नारेबाजी का केली नाही?”
- “शिंदे गटाचा गेम झाला आहे, त्यामुळेच सध्या ते चेहरे लपवत आहेत”