मुंबई : आजपासून राज्याच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. सुरूवातीपासूनच विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधी पक्षांनी बंडखोर आमदार सोबतच शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावरूनच आता बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“सिंचन घोटाळ्याचा विषय आता संपला”; मोहित कंबोजच्या ट्विटनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
आले रे आले गद्दार आले, 50 खोके एकदम ओके, इडी सरकार हाय हाय, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, असं म्हणत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अग्रस्थानी होते. त्यावरून राष्ट्रवादीच्या आमदारांना आम्हाला गद्दार म्हणायचा अधिकार नाही. यापुर्वी अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दारी करूनच शपथ घेतली होती, त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला आहे.
“भाजपने नितीन गडकरींना वगळलं, तर फडणवीसांची चांगल्या ठिकाणी वर्णी”
सत्ता गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून याशिवाय त्यांच्याकडे काहीच उरले नाही, धनंजय मुंडे यांची सगळी महाराष्ट्रातील लफडी टिव्हीवर बाहेर आली आहेत. जो लोकप्रतिनिधी आहे आणि याला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. आम्ही गद्दार नसून खुद्दार आहेत, आमच्यावर बोलण्याचा अधिकार राष्ट्रवादीवाल्यांना नाही, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्हाला पैसे घेण्याची गरज नाही, राज्यात महिन्याभरापुर्वी यांची सत्ता असताना शेतकऱ्यांना मतद केली नाही, मात्र आमच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना भरीव मदत दिली आहे. असंही त्यांनी सांगितलं.
“विनायक मेटेेंच्या पत्नीला भाजपने विधान परिषदेवर घ्यावे”; राष्ट्रवादीकडून मागणी
दरम्यान, विधानभवनात प्रवेश करतावेळी विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. सुधीर भाऊंना चांगलं खात न दिल्याने या सरकार धिक्कार, आशिष शेलारांना मंत्रिपद न दिल्याने या सरकारचा धिक्कार असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांनी शाब्दिक टोलेबाजी देखील केली. ज्यावेळी हे नेते आतमध्ये प्रवेश करीत होते. त्यावेळी विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती.
Read also
- “शिवसेना भवनासमोर शिवसेनेकडून निष्ठा दहीहंडीचे आयोजन”
- “अजित पवारांनी स्वत: च्या काकांसोबत गद्दारी केली, त्यावेळी नारेबाजी का केली नाही?”
- “शिंदे गटाचा गेम झाला आहे, त्यामुळेच सध्या ते चेहरे लपवत आहेत”
- “एकनाथ अन् देवेंद्र देवांची नावं, नानांनी यांचं नाव घेतलं तर भलं होईल”
- ” मंत्रिमंडळात बदल करून सत्तारांना शिक्षण मंत्री, राठोडांना महिला व बालकल्याण, तर सुर्वेंना गृहमंत्री करा” रूपाली पाटील