पुणे : भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागल्याने फडणवीस केंद्रात त्यांचं वजन वाढलं असल्याचं बोलण्यात येत आहे. फडणवीसांच्या निवडीनंतर आखिल भारतीय ब्राम्हण महासंघ आता कामाला लागला आहे. महासंंघाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र लिहिले आहे. फडणवीसांच्या दिल्लीतील राजकारणाची सुरूवात पुण्यातून व्हावी, अशी इच्छा ब्राम्हण महासंघाने या पत्रातुन केली आहे.
“काळी दाढी अन् पांढरी दाढी”; भुजबळांची नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी
अखिल भारतीय महासंघ पुण्यात प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या मागे ठामपणे उभा राहतो. त्यामुळे 2024 ला देखील फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्ही केंद्रात निवडणूक समितीत फडणवीस यांची निवड केली आहे. ती अतिशय सार्थ आहे. दिल्लीतील राजकारणाची फडणवीस यांची सुरूवात पुण्यातून व्हावी, अशी इच्छा या पत्रातुन केली आहे.
“आता फक्त भाषणावर जीएसटी लावायची बाकी आहे” ; छगन भुजबळांचा केंद्रावर निशाणा
फडणवीस हे भाजपचे भविष्य असून नरेंद्र मोदी यांच्यानंतर सक्षम नेतृत्वाची चर्चा होते, त्यात देवेंद्र फडणवास यांंचे नाव अग्रभागी येते. निवडणूक समितीमध्ये निवड ही फडणवीस यांची राष्ट्रीय राजकारणातील सुरूवात मानली जात आहे. भाजपकडून फडणवीस यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला जात असल्याची चर्चा दूरचित्रवाणीवर होत आहे. पुणे हा ब्राम्हण महासंघाचा गड असून फडणवीस यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. त्यामुळे पुण्यातून फडणवीस यांची उमेदवारी जाहीर करावी, असं साकडं महासंघाने भाजप नेत्यांना घातले आहे.
“फडणवीसांचा ‘सागर बंगला’ हा वॉशिंग मशीनचं काम करत आहे”
भाजपकडून केंंद्रीय संसदीय समिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना समितीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर त्यांच्याऐवजी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एडीयुरप्पा आणि आसामचे माजी मुख्यमंत्री सरमानंद सोनोवाल यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये जे,पी, नड्डा, नरेंद्र मोदी, राजनाथ शिंह, अमित शाह, एडियुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के, लक्ष्मण, एक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटीया आणि बी, एल संतोष यांना स्थान देण्यात आलं आहे.
Read also
- “शिंदे-फडणवीस सरकारचा गोविंदासाठी एक मोठा निर्णय”
- “राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार”; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
- “ठाणे मुख्यमंत्र्यांचे घर आहे, पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार?”; एकनाथ खडसे
- “विरोधकांनी पायऱ्यावर गोंधळ करण्यापेक्षा सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत”; धैयशिलराव माने
- “गुलाबराव आपण खाली बसा, इथे तुमचा काय संबंध?”; अन् सभागृहात निलम गोऱ्हे संतापल्या