मुंबई : देशात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. राज्यात अनेक ठिकणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा हा उत्सव निर्बंधमुक्त असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. भाजपने वरळी जांबोरी येथे दहीहंडीचे आयोजन केले आहे तेथे शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे दहीहंडीवरून मुंबईत भाजप आणि शिवसेना समोरा-समोर येणार असल्याने राजकारण चांगलच तापलं आहे.
“ठाणे मुख्यमंत्र्यांचे घर आहे, पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार?”; एकनाथ खडसे
भाजपने वरळी जांबोरी मैदानावर दहीहंडीचे आयोजन केले आहे. मात्र या ठिकाणी शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये जांबोरी मैदानाची होणारी हाणी थांबवावी या प्रकारचं निवेदन सहाय्यक आयुक्तांना शिवसेनेकडून देण्यात आलं आहे. याच निवेदनाची प्रत पोस्टरच्या माध्यमातुन लावण्यात आलेली आहे. याच पोस्टरवर सामनाचा फोटो देखील लावला आहे. यामध्ये “वरळीकरांचा टाहो जांबोरी मैदान जिवंत राहू द्या” असा पोस्टर लावण्यात आला आहे. यामुळे आता भाजप विरूद्ध शिवसेना असं चित्र दिसत आहे.
“विरोधकांनी पायऱ्यावर गोंधळ करण्यापेक्षा सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत”; धैयशिलराव माने
सोबतच, मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे पोस्टर टेंभी नाका परिसरात लावण्यात आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार देखील पोस्टरवर प्रदर्शित केले आहेत. टेंभी नाका परिसरातील दहीहंडीला यावर्षी विशेष महत्व देण्यात आलं आहे. मात्र यावर्षी पोस्टरवरचे चेहरे बदलले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर असल्याने दहीहंडीचा कार्यक्रम भाजपचा असल्याचे भासत आहे.
“गुलाबराव आपण खाली बसा, इथे तुमचा काय संबंध?”; अन् सभागृहात निलम गोऱ्हे संतापल्या
टेंभी नाका परिसरात शिंदे गटाची दहीहंडी साजरी केली जात आहे. मात्र या ठिकाणी भाजपच्या नेत्यांचे भेले मोठे पोस्टर लागलेले पाहयला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपकडून शक्तीप्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे येथून शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो गायब झाले आहेत. ही दहीहंडी शिंदे गटीची की भाजपची, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Read also
- “मुख्यमंत्री साहेब तुमचं वागणं बरं नव्हे”; अन् सभागृहात अजित पवारांनी हात जोडले
- “मी मंत्र्यांशी बोलतोय, तुमच्याशी नाही”; सभागृहातच राणे अन् जाधव यांच्यात खडांजगी
- “देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार”; ब्राम्हण महासंघाचं अमित शाहांना पत्र
- “शिंदे-फडणवीस सरकारचा गोविंदासाठी एक मोठा निर्णय”
- “राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार”; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट