मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानभवनात दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असून, राज्य सरकारतर्फे वर्षभर प्रो-गोविंदा स्पर्भा भरवण्यात येतील अशी घोषणा केली. तसेच गोविंदाना खेळाडूंसाठीच्या पाच टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्यांनंतर पुण्यात, मुंबईत स्पर्धा परिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावर विरोध दर्शविला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही देखील 50 थरांची हंडी फोडली”; एकनाथ शिंदेंची दहीहंडी कार्यक्रमात टोलेबाजी
दहीहंडीतील गोविंदाना खेळाडू कोट्यातून ५ टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला आहे. हा निर्णय आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येते. याबाबत अनेक विद्यार्थी आणि खेळाडूंनी फोन करुन त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध नाही, मात्र कुठलाही निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडित विषयांबाबत राजकारण होऊ नये, ही अपेक्षा. असं देखील रोहित पवारांनी बोलून दाखवलं.
“वरळी जांबोरी मैदानावर भाजपकडून दहीहंडीचे आयोजन”; शिवसेनेची पोस्टरबाजी
‘पुण्यातल्या खड्डेमय रस्त्यांवर गाडी चालवणे’ याला साहसी खेळाचा दर्जा देण्यात यावा. पुण्यातील सर्व वाहनचालकांना सरकारी नोकरीत किमान 25% आरक्षण मिळावे. असा खोचक टोला पुणे शहाराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. गावाकडे गोट्या, विटीदांडू, तसेच अनेक खेळ खेळले जातात. मग उद्या उठून ते देखील आरक्षण मागतील, तसेच चार चार वर्ष ज्यांनी अभ्यास केला आहे, जर त्यांच्या हिश्याच्या नोकऱ्या असे गोविंद पथक दोन तासांचा खेळ दाखवून घेऊन जात असतील तर हा निर्णय अत्यंत चूकीचा आहे. राज्यात बोगस प्रमाणापत्रांचा सुळसुळाट आहे. त्यात नवीन खेळांची भर पडेल. याला मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय फक्त आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेतला आहे. याविरोधात आम्ही रस्त्यावर तसेच गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
“मुख्यमंत्री साहेब तुमचं वागणं बरं नव्हे”; अन् सभागृहात अजित पवारांनी हात जोडले
दरम्यान, शहरातील तरूणांना आपल्याकडे फक्त आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केला आहे. अशा प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहे. स्पेन, चीनसारख्या देशांत पिरॅमिड म्हणून या प्रकाराचा खेळात समावेश झाला आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही दहीहंडीसाठी गोविंदा पथकांकडून रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत आहे. दहीहंडी हा सण उत्सव असला तरी त्यातील साहस आणि क्रिडा कौशल्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “महापालिकेत विजयाची हंडी फोडण्यासाठी हा निर्णय बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतला”
- “संतोष बांगर पुन्हा निवडून आले तर एक लाख लिटर दुधाचा मुख्यमंत्र्यांचा अभिषेक करेन “
- “देवेंद्रजींची जन्मभूमी नागपुर, पण ते पुण्याचे पालकमंत्री झाले तर आनंद होईल”; अमृता फडणवीस
- “उगीच कुणालातरी डिवचणं हा सगळा पोरकटपणा आहे”; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला
- अब्दुल सत्तार घेणार शरद पवारांकडून शेतीचे धडे; सत्तारांनी कृषीमंत्रिपदाचा कारभार स्विकारला