जळगाव : आदित्य ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्रभर झंझावती दौरे सुरू आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन आदित्य ठाकरे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जाहीरपणे टिका करीत आहेत. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते असलेल्य़ा गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातून गद्दारांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच येणाऱ्या निवडणुकीत या गद्दारांना धडा शिकवा असं आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी जनतेला केलं.
“आज सूर्य मावळला तर उद्या नक्की उगवत असतो, आता महाभारत घडेल”; महाडिकांचा इशारा
सरकार गेल्याचं दु:ख नाही. ते तुम्ही परत आणाल. पण प्रगतीशील महाराष्ट्रा रोखण्याच काम यांनी केलं आहे. कोविड काळात आपला जनतेचा जीव वाचवण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं. याचं जगाने कौतुक केलं. महाराष्ट्र पुढे गेला तर इतरांच काय होईल म्हणूून त्यांच्या पोटात दुखत असेल. कोणत्याही जाती धर्मात वाद न लावणारं आपलं हिंदुत्व आहे. देशात आपलं नाव होत होतं हेच त्यांच्या पोटात दुखलं असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
“ज्याठिकाणी माझ्यावर हल्ला झाला, तिथेच जाहीर सभा घेणार, बघू कुणात हिमंत आहे”; उदय सामंत
बंड करायला हिमत लागते. यांनी गद्दारी केली. गुवाहाटीला गेले, तिकडे काय काय केलं आपण पाहिलं. गुवाहाटीत गेल्यावर 40 गद्दार लोक स्वत:ला शिवसैनिक समजत होते. मजा करत होते. पण तिथला पुर त्यांना दिसला नाही. राज्यातून शिवसेना संपवण्याचा कट रचण्यात आला. आम्हाला एकटे पडण्याचं हे षडयंत्र आहे. पण मला राज्यातील जनतेला विचारायचं आहे. तुम्ही आम्हाला एकटे पडू द्याल का ? असा सवाल त्यांनी केला. तसेच गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं. बाबाजी का ठुल्लू, असा घणाघाती हल्लाबोल देखील त्यांनी बंडखोर आमदारांवर केला.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तर काहींना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे काढून टाकण्यात आले. यातच आता शिवसैनिकांना आपल्याकडे वळवण्यासाठी आदित्य़ ठाकरे महाराष्ट्राचे दौरे सुरू करीत आहेत. त्यांचा हा चौथा टप्पा असून ते सातत्याने बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्यावर टिकास्त्र सोडत आहेत.
Read also
- “देशातील काही महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न”; छगन भुजबळ
- “सत्ता तुमची पण आमदार मीच, आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढू”; राष्ट्रवादीच्या आमदाराचा सज्जड दम
- “श्वेता महालेंच्या कार्यक्रमात तुफान हाणामारी, घाईघाईत दहीहंडी फोडली”
“तर उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कवडीची देखील किमंत राहणार नाही”; देवेंद्र फडणवीस - “मुख्यमंत्री झाल्यावर असं भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात”; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला