मुंबई : ‘जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल इच्छा बोलून दाखवली आहे, याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पडळकर म्हणाले की, ‘जयंत पाटील हे अनवधानाने राजकारणात आलेलं पात्र आहे. मी एक शिक्षकाचा मुलगा आहे, माझे वडिलांची तब्येत चांगली नसल्यामुळे अनफिट झाले म्हणून मी जिल्हा परिषदेला चौकशी करण्यासाठी गेले असता तिथे मोठा भाऊ होता अशा शब्दांत भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.
‘जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल इच्छा बोलून दाखवली आहे, याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पडळकर म्हणाले की, ‘जयंत पाटील हे अनवधानाने राजकारणात आलेलं पात्र आहे. मी एक शिक्षकाचा मुलगा आहे, माझे वडिलांची तब्येत चांगली नसल्यामुळे अनफिट झाले म्हणून मी जिल्हा परिषदेला चौकशी करण्यासाठी गेले असता तिथे मोठा भाऊ होता. त्यांनी अनुकंपाखाली भरती करता येते असं सांगितले, याला फक्त पात्रात लागते. जर शिपाई व्हायचे असेल 10 पास असावे लागते, पदवी असेल तर वरिष्ठ जागा मिळते. अनुकंपामध्ये पात्रता लागते, गुणवत्ता लागत नाही. त्यामुळे जयंत पाटील हे राजाराम बापूंच्या जागी गुणवत्ता नसताना अनुकंपाच्या जागेवर राजकारणात अनवधानाने आले आहे’ अशी टीका पडळकर यांनी केली.
‘राष्ट्रवादी पक्षच भविष्यात राहील का नाही हे माहित नाही, त्यामुळे जयंत पाटील राष्ट्रवादीतून मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटत नाही’, असंही पडळकर म्हणाले.तसंच, ‘जयंत पाटलांना युनोमध्ये वगैरे पाठवता येत का, हे पवार साहेबांनी पाहायला पाहिजे, कारण ते फार बुद्धिमान आहेत अशी त्याची पक्षाची भूमिका आहे’ असा खोचक टोला सुद्धा पडळकर यांनी लगावला. गोपीचंद पडळकर यांनी याआधीही सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर विखारी शब्दांत टीका केली आहे. ‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे.