मुंबई : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येत्या एक ते दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाधिवक्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्वच शैक्षणिक संकूले बंद आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाने वेगवेगळ्या पद्धतीने नियमांमध्ये शिथीलता आणत असताना राज्यातील शैक्षणिक वर्षाबाबत अजूनही साशंकता आहे. नेमकं महाविकास आघाडी सरकार शैक्षणिक वर्षाबाबत काय निर्णय घेणार आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात संभ्रमावस्था कायम आहे.
राज्य सरकारने अकरावी आणि इतर शैक्षणिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी. परंतु, मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष प्रस्ताव मंजूर करावा, असे मत राज्याचे मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. मंत्रिमंडळाने याबाबत लवकरात लवकर कायदेशीर निर्णय घ्यावा. जेणेकरुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे चव्हाण यांनी म्हटले. त्यामुळे आता राज्य सरकारकडून 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान काही शिकवणी चालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन या विषयावर त्यांच्याशी सल्लामसलत केली आहे. त्या चर्चेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्री श्रीम. गायकवाड यांच्याशी फोनवर बातचीत करून लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्यासाठीची मागणी केली आहे. त्यानंतर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज ठाकरे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर आम्ही यावर निर्णय घेऊ असं सांगितले आहे.
Read Also :
हमीभावाने मालाची खरेदी झाली नाही तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा- युक्रांदhttps://t.co/hFBLs2BdV2 @Yukrandofficial @MiAtik01 @Kamalakar_Shete@kumar_saptarshi @SPPUSUofficial
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 2, 2020