रत्नागिरी : सिंचनाच्या बाबतीत कोकणावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अप्पर मुख्य सचिव आणि नियोजन विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
कोकणातील सिंचनासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा या मागणीला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली.
रामदास कदम यांनी कोकण विभागाच्या सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र पाच हजार कोटींचा निधी मंजूर उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन दिले होते.
स्वातंत्र्यानंतर कोकणात फक्त 1.5 टक्के सिंचन झाले असून पश्चिम महाराष्ट्रात 50 टक्के सिंचन झाले आहे. कोकण सुजलाम सुफलाम करण्यासाठी कोकणातील धरणांच्या कामांसाठी निधी मिळत नाही. मात्र कोकणच्या हक्काचे असलेल्या कोयनेच्या अवजलापैकी फक्त 10 टी.एम.सी. कोकणाला देऊन 57.5 टक्के इतरत्र घेऊन जाण्याचा घाट सुरू आहे, ही बाब त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली होती.