मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत काय निर्णय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, आमदार नियुक्तीचा निर्णय राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी येत्या १५ दिवसा घ्यावा, असे आवाहन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
राज्यपाल आणि महाविकास आघाडीत संघर्ष सुरूच आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजही राज्यपाल नियुक्त आमदारांवरुन राज्यपालांना शालजोडीतले लगावले. राज्यपाल कोणाताही वाद निर्माण करणार नाहीत, अशी अपेक्षा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत १५ दिवसांत राज्यपालांनी निर्णय घ्यावा असे आवाहन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. ते रत्नागिरीत बोलत होते. महाविकास आघाडीने बारा जणांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून शिफारस केली आहे. यावर राज्यपाल काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Read Also :
सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला तर इतिहास घडेल…
फटाकेबंदी म्हणजे ‘हिंदू धर्मविरोधी कार्य’, करणी सेनेचा आरोप
अर्णब गोस्वामीचा कारागृहातील मुक्काम वाढला..जाणून घ्या न्यायालयात काय घडलं
अर्णबवर कारवाई का झाली, याचा अभ्यास भाजपने केला नाही, जयंत पाटलांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर