जयपूर : राजस्थानमध्ये गुर्जर समाजाचा आरक्षणासाठीचा लढा पुन्हा सुरू झाला आहे. गुर्जर समाजाचे नेते विजय बैंसला यांच्या नेतृत्वाखाली गुर्जर समाजातील आंदोलकांनी भरतपूरमधील रेल्वे रुळांवर झोपत ठिय्या आंदोलन केले आहे. राजस्थानमधील गुर्जर समाजाने मोस्ड बँकवर्ड क्लास (MBC) प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
आंदोलकांनी दिल्ली-मुंबई रेल्वेलाईन पुर्णतः उखडून टाकली आहे. त्यामुळेच अनेक रेल्वेगाड्यांसह अनेक मालगाड्याचाही मार्ग बदलण्यात आला होता. त्याचबरोबर हिंडौन रोडवरही रास्ता रोको करण्यात आला होता.
Rajasthan: Members of Gurjar community continue their protest demanding reservation, in Bharatpur.
"We will continue our agitation till our demands are met. The government should accept our demands as early as possible," says Gurjar leader Kirori Singh Bainsla. #Rajasthan pic.twitter.com/ZJ7AD3mx97
— ANI (@ANI) November 2, 2020
सरकारला आमच्याशी चर्चा करायची असेल तर त्यांनी आमच्याकडे यावे, आम्ही सरकारकडे जाणार नाही, अशी मागणीवजा धमकी गुर्जर समाजाच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष हरदेवसिंह पाटवा यांनी दिली आहे.
गुर्जर समाजात 2 गट?
गुर्जर समाज यावेळी दोन गटात विभागल्याचं बोललं जात आहे. गुर्जर आरक्षण समितीचे अध्यक्ष हिम्मतसिंह गुर्जर यांचा एक गट आहे. जो राजस्थान सरकारसोबत शनिवारी झालेल्या कॅबिनेट सब-कमिटीत झालेल्या चर्चेत सहभागी झाला होता. या गटाने झालेल्या चर्चेनंतर 14 मुद्द्यांवर आपली सहमती दर्शवली आहे. तर गुर्जर नेते विजय बैंसला यांच्या नेतृत्वातील दुसऱ्या गटाकडून आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.
Read Also :
“देवेंद्र फडणवीस यांचा येत्या आठवड्यात मोठा घोटाळा बाहेर काढणार” https://t.co/hkpclolW3g @Dev_Fadnavis @Devendra_Office @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 2, 2020