नवी दिल्ली : कृषि क्षेत्रा संबंधी अध्यादेश आणणाऱ्या केंद्र सरकारला मोठा धक्का बसला असून, शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
I have resigned from Union Cabinet in protest against anti-farmer ordinances and legislation. Proud to stand with farmers as their daughter & sister.
— Harsimrat Kaur Badal (@HarsimratBadal_) September 17, 2020
शेतकरीविरोधी वटहुकूम आणि विधेयकांच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा हरसिमरत कौर बादल यांनी ट्वीटद्वारे केली. शेतकऱ्यांची बहीण, कन्या म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचा मला अभिमान आहे, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने आध्यादेशला विरोध केला आहे. लोकसभेत देखील अकाली दलाने या विधेयकाला जोरदार विरोध केला होता. त्यानंतर हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला. रसिमरत कौर बादल या केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री होत्या.