राज्यात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने अनेक मंत्री व नेते जिल्ह्यजिल्ह्यात जाऊन दौरे करत आहेत आणि तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत . ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आज अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी “नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल”, असा दावा केला आहे.
“नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल. सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना रुग्णसंख्या कमी होईल”, असा विश्वासही हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मुश्रीफ यांनी कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या संगमनेरमध्ये एक बैठक घेत कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. “जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व्हे वाढवण्यासोबत कोरोना चाचण्या वाढवाव्यात”, असे आदेश हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
“मुंबई, पुण्याहून आलेल्या लोकांमुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. लक्षणे आढळल्यास कोरोना हेल्थ केअर सेंटरला जाऊन तपासणी करावी. जिल्ह्यात संगमनेर तालुक्याचा कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक नऊ टक्के आहे”, असंही त्यांनी सांगितले