मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मी कोल्हापुरात परत येणार’ असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना टोला लगावण्याची, चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. आधी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावल्यानंतर हसन मुश्रीफ यांनीही पाटील यांना आपल्या स्टाईलने उत्तर दिलं आहे. चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वाकयुद्ध सर्वांना माहित आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरला परत जाण्याचं वक्तव्य केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वाकयुद्ध सर्वांना माहित आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरला परत जाण्याचं वक्तव्य केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरुड मतदार संघ निवडला त्याचवेळी त्यांच्यावर टीका झाली होती. आता पाटलांनी कोल्हापूरला परत येणार असल्याचं वक्तव्य केल्यामुळे चर्चा तर होणारच.
तर दुसरीकडे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही चंद्रकांत पाटील यांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. “चंद्रकांतदादांचे विरोधक म्हणजे भाजप पक्षातील आहेत. कदाचित त्यांचा इशारा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असावा, असं सतेज पाटील म्हणाले.