नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील कथित सामुहिक बलात्कार प्रकरणामुळे योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार टीका होत आहे. आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हाथरस येथे पीडित कुटुंबाची भेट देखील घेतली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी योगी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.
हाथरस येथील पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आला होता. हा दावा लज्जास्पद असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
The shameful truth is many Indians don’t consider Dalits, Muslims and Tribals to be human.
The CM & his police say no one was raped because for them, and many other Indians, she was NO ONE.https://t.co/mrDkodbwNC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 11, 2020
योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत राहुल गांधींनी ट्विट केले की, लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय लोक दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूसच समजत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे आणि त्यांच्या पोलिसांचे म्हणणे आहे की, कुणीही बलात्कार केला नाही. कारण त्यांच्यासाठी आणि इतर अनेक भारतीयांसाठी ती कुणीही नव्हती.
दरम्यान, आता हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयने आपल्या हातात घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारने याबाबत शिफारस केली होती.