मुंबई – गुजराती माणसाने उद्धव ठाकरे याना आपड़ा म्हटल्यावर भाजपच्या अतुल भातखळकर यांचा तीळ पापड़ा झाला बहुतेक ! ते काल पासून नुसता खळ खळ करतायत , मला त्याना विचारवेसे वाटते अतुल भातखळकर तुम्ही नेमके कोणाचे ? भाजपला वोट देणाऱ्या गुजराती माणसांचे की मराठी मातीत जन्मलेल्या मराठी माणसांचे ? असा सवाल करत शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी भाजपच्या अतुल भातखळकर यांना केला.
अहो गुजराती माणसाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला नेहमी आपले मानले , 1992-1993 च्या दंगलीमधे गुजराती बांधवाना खरी मदत केली , संरक्षण दिले ते शिवसेनेने आणि बाळासाहेब ठाकरे यानी , मी मुंबईकर म्हणून मुंबईतील सर्व धर्मियाना आपलेपण दिले ते उद्धव ठाकरे यानी , भाजपने फ़क्त मतदान होण्यापुरते गुजराती बांधवांना वापरले तेही मोदींच्या नावाने , आपडो माणस म्हणत नुसती गुजराती बांधव आणि भगिनींची मते घेतली आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडले हेच खरे आहे ना ? असा सवाल करत शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी भाजपच्या अतुल भातखळकर यांची शाळाच घेतली आणि भाजपच्या नेत्यांच्या गुजराती समाज बांधवांन बद्दल काढलेल्या बालिश वक्तव्याचा समाचार घेतला.
हेमराज शाह पुढे म्हणाले भाजपचे भातखळकर फार मोठ्या बाता मारत होते म्हणे गुजराती मतदार सोडा मराठी मतदार पण शिवसेनेला मतदान करणार नाही म्हणे ,” अहो भातखळकर तुमची अवस्था सध्या घर का ना घाट का अशी झाली आहे , बाबरी यांनी नाही पाडली, राममंदिराचा निर्णय यांनी नाही घेतला, पैसा जनतेचा वापरणार , मग श्रेय कसले?” असा सवाल आता देशाची जनता तुम्हाला विचारते आहे , देशभरातील गुजराती आणि हिन्दुनी मिळून रामजन्मभूमी आंदोलन पेटवले होते हे तुम्ही विसरलात त्याची फळे आज भलतेच कोणी चाखत आहे , भाजपचे नेते अस्वस्थ आहेत , मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजप मधे परेशान आहेत , त्याना कोणीही विचारेनासे झाले आहे , भातखळकर गुजराती माणूस स्वाभिमानी आहे , भाजपने त्याला स्वतःची जागीर समजू नए , मुंबईमा उद्धव ठाकरेच आपडा वाटणार कारण ते सुसंस्कृत माणूस आहे , गुजराती माणसाला ते आवडतात , तुम्हाला जळफळाट होण्याचे कारण ज्या गुजराती मतांवर डोळा ठेवून तुम्ही मुंबईत राजकारण करता त्यांनाच तुम्ही नंतर खोटी आश्वासन देवून फसवता , मुंबईत फ़क्त लोढ़ा तुम्हाला हवा बाकी गरीब गुजराती मारवाड़ी समाज नको म्हणून सर्व भाजप वर गुजराती समाज नाराज आहे आणि त्याना शिवसेना आणि उद्धव ठाकरे आपले वाटतात , भाजपच्या पाया खालची वाळू गुजराती समाज सरकावल्या शिवाय राहणार नाही . अशी खात्रीही हेमराज शाह यांनी भातखळकर यांना दिली आहे.