महाड येथे इमारत दुर्घटना घडल्यानंतर महाराष्ट्र सरकारने तात्काळ दुर्घटनाग्रस्तांना मदत जाहीर केली आहे यामध्ये मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत देण्याचं जाहीर करण्यात आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राणे यांनी सरकारवर विश्वास कसा ठेवणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण, निसर्ग वादळच्या तडाख्यात सापडलेल्या रायगडवासीयांना अद्यापही पूर्ण नुकसान भरपाई मिळाली नाही. आता, महाड इमारतीच्या मदतीची घोषणा या सरकार नी केली आहे. पण, या विश्वासघाती सरकारवर कसा विश्वास ठेवायचा जनतेने ?, असे नितेश राणेंनी म्हटले आहे. राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा प्रश्न उपस्थित केला आहे.
रायगड ला अजुन निसर्ग वादळ ची पुर्ण नुकसान भरपाई मिळाली नाही..
आता कालच्या इमारतीच्या मदतीची घोषणा या सरकार नी केली आहे..
या विश्वासघाती सरकार वर कसा विश्वास ठेवायचा जनतेने ???— nitesh rane (@NiteshNRane) August 25, 2020
कशी घडली नेमकी घटना
महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन ही इमारत कोसळली. इमारत कोसळताना मोठा आवाज झाला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. पत्त्याची इमारत कोसळावी, तशी ही पाच माळ्यांची इमारत कोसळली. यावेळी धुराचा मोठा लोट पसरला. परिसरात नागरिकांची गर्दी जमली, इमारत अशी अचानक पडल्याने नागरिक आराडा-ओरडा आणि आक्रोश करीत होते, तर काहींनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मदत मिळावी, म्हणून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीसाठी धाव घेतली. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ८ जणांना वाचवण्यात यश आलं आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सरकारने या दुर्घटनेतील पीडितांच्या कटुंबीयांना मदत जाहीर केली आहे.