नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका, राजर्शी शाहु महाराजांची आणि आजच्या परिस्थितीची भुमिका पाहणे महत्वाचे आहे. परंतू मराठा समाजाची दिशाभूल करून माझ्या भूमिकेवर संशय घेण्यात येत आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. आंदोलन काय असते हे मला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. समाजाची दिशाभूल करणाऱ्यांनी मला शहाणपण शिकवू नये. २००७ पासून अवघा महाराष्ट्र मी पिंजून काढला आहे, अशी रोकठोक भूमिका छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मांडली. नाशिक येथिल पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोना महामारीने आज राज्यात थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांचे जीव वाचवणे महत्वाचे आहे. कारण माणसे जगली तरच आरक्षणाचा फायदा आहे. अन्यथा त्याचा काय उपयोग होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आऱक्षण देण्याचा निर्णय रद्द ठरवला. या आरक्षणासाठी २०१७ साली आझाद मैदानावर आम्ही सगळे एकत्र आलो होते. आमची भुमिका स्पष्ट आहे. आमच्या नावाने बोंबलनारे, आता मला शहाणपण शिकवताय, २०१७ साली काय एकत्र आले नाही. तेव्हा कुठे गेले होते. केवळ मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे, असेही संभाजीराजे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हे सरकार केवळ हात झटकत आहे. समोरच्यावर टिका करून जबाबदारी ह्याची त्याच्यावर आणि त्याची ह्याच्यावर ढकलण्याचे काम करत आहे. अरे जबाबदारी काय ढकलताय सोल्युशन सांगाना. २००७ साला पासून मी समाजाला दिशा देण्याचे प्रयत्न करत आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्शी शाहु महाराजांचे संस्काऱ आहेत. लोकांना सध्या भिती वाटत आहे. परंतू मी थांबणार नाही. अवघा महाराष्ट्र फिरणार आहे. माझ्या भूमिकेवर संशय घेवू नका, असे संभाजीराजे भोसले म्हणाले.
२७ तारखेला मी मुंबईत येत आहे. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखिल भेट घेणार आहे. तत्पुर्वी कोल्हापुर, नांदेड आदी ठिकाणी जावून तेथिल नेत्यांशी चर्चा करणार आहे. मुंबईत गेल्यानंतर माझी भूमिका स्पष्ट होईल. समाजाची भावना समजून घेणे गरजेचे आहे. त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याच प्रयत्न करू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.