मुंबई : बाईला समोर ठेऊन मी राजकारण करत नाही, असा टोला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना देवेंद्र फडणवीसांवे लगावला आहे. खडसे असताना सामाजिक कार्यकरत्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर मोठे गंभीर आरोप केले होते. आणि त्या आरोपांना फडणवीसांचे बळ आहे असा आरोप अनेकदा एकनाथ खडसेंनी केला होता.
सर्वांना प्रतीक्षा असताना आता भाजप नेते एकनाथ खडसे यांची अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपासून खडसे हे भाजप सोडणार याची मोठी चर्चा सुरु होती. पण आता ती प्रतीक्षा संपली आहे. मुंबईत एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंनी पक्षप्रवेश केला आहे.
२०१४ ला भाजप सरकार आल्यापासून माझी पक्षात गळचेपी होत असल्याची तक्रार खडसे यांनी नेहमी केली होती. त्यांच्या टीकेचा रोख हा नेहमी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचयाकडे असायचा. पण आता या सर्व वादांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
मी ४० वर्ष भाजपमध्ये काम केल आहे. मला अशी अपेक्षा नव्हती कि भाजप मला अशा पद्धतीने वागणूक देईल, पण आता मोकळा श्वास सोडलंय आत प्रवेश करताना मी कुठलीही अट किंवा आमिष घेऊन राष्ट्रवादीत आलेलो नाही, मी प्रामाणिकपने राष्ट्रवादीच काम करणार आहे, असं पक्षप्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. तसेच यांनी प्रवेश करतानाच्या भाषणात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Read Also :
अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटीची मदत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणाhttps://t.co/gIpqQwo6yg @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 23, 2020