अमरावती : दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग राज्यात वाढत असला तरी, आता शाळा सुरू करण्याची मागणीही होत आहे. अशातच दिवाळीनंतर करोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्याचे संकेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले होते.मात्र आता पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबाबत अवघड असल्याचे सूचक कडू यांनी व्यक्त केले आहे.
कदाचित करोनाचे संक्रमण आतापेक्षा कमी झाले आणि आपल्याला वाटले की, शाळा सुरू करायला हरकत नाही. त्यावेळी त्या सुरू करता येतील. परंतु आपण जगाचा विचार केला तर, १३ हजार विद्यार्थी ब्रिटनमध्ये करोनाबाधित झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आपण खबरदारीने पावले उचलायला हवी, असे त्यांनी सांगितले.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील सर्वच शाळा-महाविद्यालये बंद आहेत. काही दिवसांपूर्वी दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले होते. मात्र, आता दिवाळीनंतरही करोनाचा संसर्ग वाढतच राहिला तर, राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करणे अशक्यच राहील, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.
आपण आधी ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल का, याचा विचार करत होतो. मात्र, करोनाची वाढती परिस्थिती पाहता दिवाळीनंतर याची दुसरी लाट आली आणि संक्रमण वाढले तर आपल्याला दिवाळीनंतरही शाळा बंद ठेवाव्या लागणार आहेत, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
Read Also
महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा ! कोरोनामुळे शिवसेनेचा 'हा' नेता लीलावती रुग्णालयात दाखल https://t.co/FsL23pdXZr#Shivsena #MahavikasAaghadi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 12, 2020