नगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व प्रमुख नेत्यांची ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय शिबीराचे आयोजन ४ व ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत माध्यमांना दिली. राज्यातील तसेच देशातील राजकीय वर्तमानस्थिती संदर्भातील कार्यकर्त्यांचे आकलन वाढविण्यासाठी, तसेच भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे हा या शिबीरा मागील उद्देश असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
“माझी नाहीतर देशातील 130 कोटी जनतेची मागणी”; केजरीवालांचं मोदींना पत्र
‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या शिबीरात होणाऱ्या उपक्रमाची माहितीही प्रदेशाध्यक्षांनी दिली. या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. वेगवेगळ्या विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही विचारवंत व अभ्यासकांना बोलविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
ती निवडणुक भाजप कदाचित जिंकेलही परंतु…; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
पक्षाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात राज्यभर सभासद नोंदणी सुरू आहे. पक्षाला यंदा २३ वर्ष पूर्ण झाली असून येत्या जून महिन्यात पक्ष रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करेल. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले- आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासत पक्षाने साडेसतरा वर्ष सत्तेत राहून जनसेवा केली आहे. या शिबीराच्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील राजकीय परिस्थिती, वाढती बेरोजगारी, महागाईचा प्रश्न, घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन होईल.
“ठाकरेंनी अडीच वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतल्यानेच ‘एअरबस टाटा’ गुजरातमध्ये गेला”
या शिबीराला राज्यातून सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हानिरीक्षक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच राज्य स्थरावरील फ्रंटल सेलचे प्रमुख उपस्थित राहतील असे ते म्हणाले. यासोबतच इतर फ्रंटल सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी भविष्य काळात योग्य नियोजन करून चर्चा केली जाईल, असे जयंतराव पाटील यांनी आश्वस्त केले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.
Read also
- “मिंधे-फसनवीस सरकारने आता ‘जय जय गरवी गुजरात’ हा नारा बुलंद द्यावा”; सेेनेची जहरी टिका
- “सध्याच्या घडीला नारायण राणेंची किंमत चार आण्याची आहे”
- “..तर एक दिवस शिंदे सरकार मुंबईलाही गुजरातला देऊन टाकतील”
- “आपले मुख्यमंत्री दहीहंडी, मंडळ, फोडाफोडी या व्यतिरिक्त काहीच करत नाहीत”
- “25 पैशांवर नारायण राणेंचा फोटो.. हे फायनल करा..!” वादग्रस्त पोस्ट व्हायरल