कोल्हापूर : काल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून झालेल्या प्रकारबद्दल भाष्य केले. पंजाबमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे काही घडलं ते संपूर्ण देशाने बघितलं आहे.
राष्ट्रवादीची वाटचाल देशपातळीकडे; उत्तरप्रदेश, मणिपूरसहित गोव्यातही निवडणूक लढवणार
नरेंद्र मोदी यांचा घातपात करण्याचा हा एक प्रकारे डाव होता असं एका वृत्त वाहिनीच्या स्टिंग ऑपेरेशन वरून समोर आलं आहे. त्यामुळं आता तरी काँग्रेस सरकारनं मान्य करावं की पंजाब सरकारने पंतप्रधानांना योग्य सुरक्षा पुरवली नाही. काँग्रेस आणि इतर ज्या कोणत्या पक्षांनी खिल्ली उडवली त्यांनी देखील एकदा त्या वृत्त वाहिनीचा स्पेशल रिपोर्ट बघावा आणि घटनेचं गांभीर्य ओळखावं.
पुणे महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची जोरदार चर्चा…
जेव्हा आंदोलक रस्ता अडवत होते तेव्हा त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेखातर बाजूला करणे गरजेचे होते. त्या आंदोलक शेतकऱ्यांमध्ये काही खलिस्तानी देखील घुसले होते असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यानंतर चंद्रकांत दादांनी थेट उत्तरप्रदेश, गोवा राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ज्या काही हालचाली करत आहेत त्याबद्दल भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी स्वतःच्या जीवावर महाराष्ट्रात सरकार आणलं नाही तरी धरून आणलेले का असेना गोव्यात, उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रवादीचा एक एक आमदार तरी सध्या आपल्याला दिसत आहे.
अहमदनगरच्या पालकमंत्री पदी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर..
सध्या चालू असलेल्या घडामोडींवरून असं वाटत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं आहे. एसटी कामगारांचा प्रश्न असो किंवा इतरही काही महत्वाच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या जागी पवारच बैठका घेतात म्हणून चंद्रकांत दादांना तसं वाटलं असेल अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.
Read also:
- पंतप्रधान मोदींच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न असल्याचे स्पष्ट
- महापौर पेडणेकरांच्या कंपनीला कोविड केंद्राचे १.९७ कोटींचे पेमेंट – किरीट सोमय्या
- महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं कंबर कसली; औरंगाबादमध्ये आणखी दोन नव्या शाखांच उद्घाटन
- पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल
- अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पालकमंत्री मात्र राजकारणातच व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे