जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. यावरच बोलताना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी खडसे भाजपतून जाणे महत्त्वाचे आहेत. मग ते कोणत्याही पक्षात गेले तरी आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तसंच खडसेंनी भाजप सोडणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. जळगावातील अजिंठा विश्रामगृहात गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक, एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा अशा विषयांवर मते मांडली.
गुलाबराव पाटील म्हणाले, “एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. लीडर म्हणून त्यांची पत आहेच. ते 30 वर्षे आमदार राहिले आहेत. मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते शिवसेनेत आले, राष्ट्रवादी गेले किंवा काँग्रेसमध्ये गेले तरी आम्हाला आनंद आहे. खडसे भाजपतून गेले, हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे”.
गुलाबराव पाटील यांना बिहार विधानसभा निवडणुकीरता शिवसेनेने स्टार प्रचारक म्हणून संधी दिली आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ‘स्टार प्रचारक’ म्हणून संधी दिली आहे. हा जळगाव आणि खान्देशाचा सन्मान आहे, असे मी मानतो. योगायोगाने आपल्या आणि त्यांच्या प्रदेशातील भाषेचा वेगळा वेगळा प्रभाव असणार आहे. मी निश्चितच पक्षासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे”.
Read Also
रोहित दादा, तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा ! तुम्हाला साधा गावातला रस्ता करता येत नसेल… भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा सवाल https://t.co/EiyqYbSZKe#SharadPawar #RohitPawar #NCP @GopichandP_MLC #GopichandPadalkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 10, 2020