श्रीरामपुरातील आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात कोरोना तपासणी केंद्राचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी तेथे रिक्षा देखील चालवून पाहिली. रिक्षा चालवल्यानंतर सुजय विखेंनी सरकारवर देखील मिश्किलपणे निशाणा साधला.
रिक्षा चालवण्याचा अनुभव कसा होता ? असा प्रश्न विचारला असता सुजय विखे म्हणाले की, रिक्षा चालवताना राज्यातील तीनचाकी सरकार चालवणे देखील अवघड आहे हे लक्षात आले. त्यामुळे हे तीनचाकी सरकार किती दिवस चालेल, किती स्थिर चालेल त्यात बसलेले लोकं किती घाबरुन आहेत हे पाहिले.
रिक्षाप्रमाणेच तीन पक्षांचे सरकार चालविणेही अवघडच आहे. त्यामुळंच लोकांचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. ज्यांना कुणाला हे सरकार कसे चालते याचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी रिक्षा चालवून पाहावी. स्वत: अनुभव घ्यावा. माझी खात्री झाली आहे की हे सरकार जनतेसाठी काहीच करू शकत नाही. करोनाशी लढण्यात, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्यात अपयशी ठरलं आहे. या सरकारकडून अपेक्षा करणेही व्यर्थ आहे. हे सरकार 5 वर्ष टिकणारच नाही, असेही यावेळी सुजय विखे म्हणाले.