राज्याच्या आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय १७ हजार जागांसाठी कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढवा घेण्यासाटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर आले होते.त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि इतर सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांची उपस्थिती होती. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे .
यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘आरोग्य विभागात आता मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. मेरिटवर थेट भरती करण्याला परवानगी मिळाली असून, राज्यात 17 हजार जागा लवकर भरल्या जाणार आहेत,’ अशी माहिती टोपे यांनी दिली. तसेच, राज्यातील मृत्यूदराबाबत बोलताना टोपे म्हणाले की, ‘राज्यात कोरोना परिस्थिती सकारात्मक आहे. धारावी, मालेगाव झिरोवर आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील स्थिती सुधारत आहे. आमचा प्रयत्न हा मृत्यूदर कमी करणे आहे आणि त्यात यश मिळत आहे’,