मुंबई : बोरिवलीतील बाभई आणि वझिरा या गावठाणमध्ये प्रचार सुरू असताना भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मच्छिचा वास सहन न झाल्याने या प्रचार यात्रेच्या दरम्यान नाकाला रूमाल लावूनच प्रचार केला. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना पियुष गोयल यांचे वागणे अपमानास्पद वाटले. अशी बातमी देणाऱ्या मुंबई : नवाकाळच्या पत्रकार नेहा पुरव यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याची माहिती समोर आलीय. या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाने भाजपवर टिका करत जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
भाजपकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अशातच पियुष गोयल यांनी आपला प्रचार करण्यासाठी बोरिवलीतील काही वस्त्यांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांना मासळीचा वास सहन न झाल्याने तोंडाला रूमाल बांधले असल्याची बातमी नवाकाळच्या पत्रकार नेहा गुरव यांच्या निवासस्थानी घुसून भाजपच्या गुंडांकडून धमकावलं गेलं. या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा..पुण्यात मोहोळांची की धंगेकरांची ताकद ? ; आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पुणेकरांचं मतं काय?
नेहा गुरव यांच्या निवासस्थानी घुसून भाजपच्या गुंडांकडून धमकावलं गेलं. या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे. तर लोकशाहीच्या गळचेपीचा, गुडगिरीचा आणि हूकुमशाहीचा अंत करायलाच हवा. तर लोकशाहीच्या गळचेपीचा, गुडगिरीचा आणि हूकुमशाहीचा अंत करायलाच हवा. असा इशारा देखील त्यांनी दिलाय.
संदर्भ: X (Twitter) वरती Mumbai Press Club दिलेल्या माहितीनुसार pic.twitter.com/mqZEuuQ6Uk
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 26, 2024
READ ALSO :
हेही वाचा. “श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खाल्ले “, मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रावर गंभीर आरोप
हेही वाचा… मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी ! मुरलीधर मोहोळ