माढा : भाजप ४०० पारचा नारा देत आहेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता त्यांची २०० पार करायची देखील पंचायत आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. रिपोर्टिंग बघितलं तर ८ पैकी ८ जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील हा कार्यकर्त्यांना आत्मविश्वास असल्याचं राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, आपला पक्ष फुटला. काही जणांनी विचारधारा बदलली. मात्र पोरं शाळा सोडून गेली तर शाळा कधी बंद पडत नाही. पुन्हा नव्याने विद्यार्थी घडवण्याचे काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो. आमचा हेडमास्तर लई खमक्या आहे. पवार साहेब म्हणजे मतांचा विषय नाही. तुमच्या आमच्या काळजातला विषय आहे. असं म्हणत जयंत पाटलांकडून शरद पवारांची स्तृती करण्यात आलीय.
आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. भारतीय जनतेच्या आकांक्षा ज्यात गुंतलेल्या आहेत अशा सर्व मुद्द्यांना आपण स्पर्श केलेला आहे. हा जाहीरनामा वाचून भाजपच्या अध्यक्षांचा तीळपापड झालेला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत. सर्वसामावेशक घटना बदलण्याचे पाप भाजपच्या मनात आहे. आपल्या बीडच्या पंकजाताईंनी देखील हे बोलून दाखविले. असेही जयंत पाटील यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“तुम्ही सारखं सारखं कुटुंब म्हणून काय टाहो फोडताहेत ?”रोहिणी खडसेंचा चाकणकरांवर पलटवार
दरम्यान, भाजप ४०० पारचा नारा देत आहेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता त्यांची २०० पार करायची देखील पंचायत आहे. महाराष्ट्रात दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. रिपोर्टिंग बघितलं तर ८ पैकी ८ जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील हा कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे. युतीत एकमत नाही. उसने उमेदवार घेऊन निवडणूक लढवण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बदलाचे स्वागत होत आहे. आपल्या भागातील दुष्काळ कायमचा मिटवण्यासाठी आपले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावा. ते आपल्या प्रश्नांना संसदेत मांडून न्याय मिळवून देतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिरूरमध्ये ‘बारी सुसाट’”, कोल्हेंना मोठा धक्का ?
हेही वाचा…“शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदींची जाणीवपुर्वक सभा”, विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…“पंधरा हजार नौकऱ्या देणार होता त्याच काय झालं ?” खासदारांना आमदार विक्रम काळेंचा सवाल
हेही वाचा…“..त्यामुळेच अर्चना पाटील विजयी होतील, “आमदार विक्रम काळेंनी व्यक्त केला विश्वास