कोल्हापुर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. कोल्हापुरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी देण्यात आलीय. यातच आता मोदींच्या सभेवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी भाजपवर टिका केलीय.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना इतकं हतबल झालेलं कधीही पाहिलं नाही
शिव-फुले-शाहू-आंबेडकर या व्यक्ती नाही तर विचार आहे. हाच महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे अन् महाराष्ट्र धर्म आहे. पण इतर ठिकाणी सभा घेण्याऐवजी पंतप्रधान मोदीजी याच महापुरुषांपैकी राजर्षी शाहू महाराज यांचे वारसदार कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा पराभव करण्यासाठी कोल्हापूरमध्ये जाणीवपूर्वक सभा घेतायेत. तरी कोल्हापूरची जनता पुरोगामी विचारांनाच साथ देईल. असा विश्वास शाहू महाराजांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा…“नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं”, शरद पवारांचं मोठं विधान
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून शाहू महाराजांवरून अनेक वाद विवाद सुरू आहे. राजवर्धन कदम यांनी थेट राजर्षी शाहू महाराजांचे वंशज असल्याचा दावा केला होता. ते आज धुळ्याहून खास विमानाने राजवर्धन कदमबांडे कोल्हापुरात येणार असल्याचीही माहिती आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना 1962 ला कोल्हापुरात छत्रपती घराण्यात दत्तक घेण्यावरून वाद झाला होता. दत्तक प्रकरणाचा हा वाद अद्यापही न्यायालयात असल्याचा महायुतीच्या नेत्यांनी कालच दावा केला होता. आता आज मात्र राजवर्धन कदम बांडे नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“पंधरा हजार नौकऱ्या देणार होता त्याच काय झालं ?” खासदारांना आमदार विक्रम काळेंचा सवाल
हेही वाचा…“..त्यामुळेच अर्चना पाटील विजयी होतील, “आमदार विक्रम काळेंनी व्यक्त केला विश्वास
हेही वाचा…“तुम्ही सारखं सारखं कुटुंब म्हणून काय टाहो फोडताहेत ?”रोहिणी खडसेंचा चाकणकरांवर पलटवार