सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये गेल्या दहा वर्षापासून देशाची सत्ता आहे. नरेंद्र मोदी सुरूवातीला मुख्यमंत्री होते, त्याआधी ते आरएसएसचं काम करत होते. नरेंद्र मोदींना मंत्रिमंडळामध्ये जाऊन देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, पाच वर्ष, दहा वर्ष झाली आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याची संधी द्या अशी विनंती त्यांच्या काही सहकाऱ्यांकडून केली जात आहे. परंतु नरेंद्र मोदी यांना संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं असल्याचे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. माढा लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…नगरमध्ये लंकेंच्या विरोधात डमी उमेदवार रिंगणात, निलेश लंकेंचा विखेंवर जोरदार घणाघात
देशातला सामान्य माणूस जो व्यवसायावर अवलंबून आहे. त्या व्यवसायाच्या संबंधित या गृहस्थांमध्ये काहीच भावना नाहीत. तो व्यवसाय म्हणजे या देशातील ७० टक्के लोक शेती करतात, तर बळीराजाचा तो व्यवसाय आहे. मोदींनी शेतकरी आणि शेती यांच्या संबंधीतीत कितपत आस्था आहे. त्याची शंका माझ्या मनात वारंवार येत असल्याचा टोलाही शरद पवारांनी मोदींना लगावला.
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, ही निवडणुक साधीसुधी नाही. अनेक निवडणुकीमध्ये गेलो आहे. सुदैवाने तुम्ही भाग्यवान आहात, गणपतराव देशमुखांसारखा एक समाजासाठी प्रामाणिकपणाने उभं आयुष्य जनतेची सेवा करणारे एक नेतृत्व आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लाभलं. आज ते हयात नाहीत पण त्यांनी जो रस्ता दाखवला, तो रस्ता हयात आहे. त्या रस्त्याने जाण्यासाठी तुमच्यासारखे हजारो लोक हयात आहेत आणि त्यांचा आदर्श या निवडणुकीमध्ये दिसेल आणि ही निवडणूक जी अपेक्षा लोकांची आहे, त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने यशस्वी होईल , अशी खात्री देखील त्यांनी व्यक्त केली.
READ ALSO :
हेही वाचा…“तटकरेंना दिलेलं प्रत्येक मत मोदींना जाणार”, फडणवीसांचं रायगडमध्ये मोठं विधान
हेही वाचा…“शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोमुळे वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध”, मुरलीधर मोहोळ
हेही वाचा..“मोहोळांचा विजय काल पुणेकरांनीच दाखवून दिला”, रूपाली चाकणकरांचं मोठं विधान