धाराशिव : धाराशिवमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जोरात प्रचार सुरू केला आहे. अर्चना पाटील यांच्यासोबत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वत : लक्ष घालून मतदारसंघात गावबैठका, कोपरा सभा आणि नागरिकांच्या गाठीभेटीवर भर दिलाय. अशातच अर्चना पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार गटातील आमदार विक्रम काळे यांनी पत्रकार परिषद पार पडली. त्यात त्यांनी अर्चना पाटील धाराशिवमध्ये नक्कीच विजयी होतील. असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी विक्रम काळे म्हणाले की, “केंद्रात मोदी सरकारने तर राज्यात महायुतीच्या सरकारने जनतेच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी जोमाने प्रचारकार्य सुरू केले आहे. यामुळे धारशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील या विजयी होतील. असा विश्वास देखील अर्चना पाटील यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा…“तटकरेंना दिलेलं प्रत्येक मत मोदींना जाणार”, फडणवीसांचं रायगडमध्ये मोठं विधान
यावेळी पुढे बोलताना काळे म्हणाले की, महायुतीच्या उमेदवार पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा व मित्रपक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जोमाने कार्य सुरू आहे. पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी ढोकी येथे मेळावा घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपआपल्या भागातून महायुतीला मताधिक्य मिळवून देण्याचे आदेश दिले आहेत.
तर मोदी सरकारने या भागाचा विकास व्हावा यासाठी धाराशिव- तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गास मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी राज्याच्या हिस्स्याचे ४५० कोटी रुपये अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजूर केले असून हे कामही सुरू झाले असल्याचे काळे यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“तुम्ही सारखं सारखं कुटुंब म्हणून काय टाहो फोडताहेत ?”रोहिणी खडसेंचा चाकणकरांवर पलटवार
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना इतकं हतबल झालेलं कधीही पाहिलं नाही
हेही वाचा…“नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं”, शरद पवारांचं मोठं विधान