केंद्र सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नामकरण करत शिक्षण मंत्रालय केले. याशिवाय तीन दशकानंतर नवीन शैक्षणिक धोरणांना देखील मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे आता शिक्षण क्षेत्रात मोठे बदल पाहण्यास मिळणार आहे. सोबत दहावी-बारावीच्या परिक्षांनाही आधी एवढे महत्त्व उरणार नाही.
दहावी बारावीचा “तेरावा” घातला… शिक्षण पध्दती बदलली. आनंद आहे.. आता मुलांची रॅट रेस संपवा. जगू द्या त्यांना. कधी कधी वाटतं पालकांची परीक्षा घ्यायला हवी. तसाही त्यांचा आभ्यास झालेलाच असतो. #educationpolicy
— Kedar Shinde (@mekedarshinde) July 29, 2020
दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही या नव्या शैक्षणिक धोरणाविषयी आपले मत मांडले आहे. त्यांनी ट्विट केले की, “दहावी बारावीचा “तेरावा” घातला… शिक्षण पध्दती बदलली. आनंद आहे.. आता मुलांची रॅट रेस संपवा. जगू द्या त्यांना. कधी कधी वाटतं पालकांची परीक्षा घ्यायला हवी. तसाही त्यांचा अभ्यास झालेलाच असतो.
दरम्यान, नवीन शिक्षण धोरणात आता शालेय शिक्षणाची रचना आता 10+2 ऐवजी 5+3+34 अशी झाली आहे. पहिली तीन वर्षे पूर्वप्राथमिक, त्यानंतर दोन वर्षे पहिली व दुसरी, पुढील तीन वर्षे तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी आणि अखेरची ४ वर्षे नववी ते बारावी अशा १५ वर्षांमध्ये शालेय शिक्षण विभागण्यात आले आहे.