पुणे : महाराष्ट्रात आता शेवटच्या दोन टप्प्यात शिल्लक राहिलेल्या २४ जागांपैकी कॉंग्रेस फक्त सहा जागा लढवत आहे. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि प्रियांका गांधी कॉंग्रेस उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. येत्या १३ मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यात कॉंग्रेस पुणे, जाला आणि नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसात कॉंग्रेसच्या नेत्यांच्या सभांचा धडाका बघायला मिळणार आहे.
हेही वाचा…“एका ठिकाणी स्थिर नसणारा माणूस आपल्या कामाचा नसतो,” प्रफुल्ल पटेलांचा कोल्हेंवर निशाणा
पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी राहुल गांधी यांची पुण्यात सभा पार पडली. तर आता कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी १० मे रोजी नंदुरबारमध्ये प्रचार करणार आहेत. तर पाचव्या टप्प्यात कॉंग्रेस पक्ष उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि मुंबई या दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात राजकीय वातावरण चांगलचं पेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासाठी येत्या १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्याच्यासंदर्भात योजना आखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातील मतदान पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रातील पश्चिम मतदारसंघात प्रचार होणार आहे. यासाठी आता सगळीच यंत्रणा महायुतीने पश्चिम महाराष्ट्रात आणल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुढील काही दिवस राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आगामी काळात काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील ; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ
हेही वाचा..“अमोल कोल्हेंना त्यांची जागा दाखवून द्या,” कोल्हेंच्या विरोधात अजितदादांनी शड्डू ठोकला
हेही वाचा…बारामतीनंतर आता पुणे लोकसभा निवडणुकीकडे महायुतीचं लक्ष, पुण्यात महत्वाची बैठक