मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांनामध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. महापालिकेतील आयुक्तांनी राजीनामा न स्विकारल्याने ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यावरून आता राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनसेने देखील शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.
माझी निष्ठा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंशी”; ऋतुजा लटकेंनी विरोधकांना सुनावलं खडेबोल
शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके ह्या महापालिकेत क्लार्क म्हणून काम करीत होत्या. पोटनिवडणुकीकरीता त्यांनी महापालिकेला नोकरीच्या राजीनाम्यासंदर्भात अर्ज केला होता. परंतु तो राजीनामा अद्यापही आयुक्तांनी स्विकारला नाही. त्यावरून मनसेनेने शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. मुळात लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकावून अंधेरीची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेचे अनिल परब यांचा डाव, लटके वहिनींनी ओळखावा इतकच आहे. असं मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
“प्रसंगी रक्ताचा सडा पडला होता, पण आता लाल बावटा ठाकरेंच्या मदतीला आला धावून”
तर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी भाजप आणि शिंदेंवर देखील आरोप केले आहेत. ऋतुजा लटके यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. तसेच त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत आहेत. असं देखील म्हटलं जात आहे. शिवसेनेचे आरोप शिंदे आणि फडणवीसांनी फेटाळून लावले आहेत. तसेच भाजपने उलट आता उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
“कमळ अन् ढाल-तलवार हे दोन्ही मिळून तुम्हाला जागा दाखवू”; भाजपचा आघाडीवर हल्लाबोल
दरम्यान, विधानसभेची पोटनिवडणुक लढवण्यासाठी मी माझ्या पदाची 3 ऑक्टोंबरपासून राजीनामा देत आहे. महानगरपालिकेच्या सेवा नियमावलीनुसार माझी एक महिन्याच्या सुचनापत्राची अट विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे शिथिल करावी अशी विनंती ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबर रोजी दिलेल्या पत्रात केली आहे.
Read also
- “लटकेंचा राजीनामा स्वीकाराला नाही तर…..ठाकरेंकडे आहेत हे तीन पर्याय”
- “पालिकेला ऋतुजा लटकेंनी दोनदा अर्ज केले”; शिंदे सरकारकडून विनाकारण अडवणुक ?
- “अण्णाभाऊ साठे सभागृहाचं काम लवकरात लवकर व्हावं”; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- “भाजपची वाण नाही पण गुणात वाहून तुमची प्रतिमा मलिन करू नका”; रूपाली पाटील
- “बंडखोरांच्या मतदार संघात फिरून आलो, लोक म्हणतात यांचे डिपॉझिट जप्त होणार”